शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"तरुणांच्या मृत्यूने दुःख, संयम राखा"; नेपाळमधील हिंसक आंदोलनावर भारताने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:46 IST

नेपाळमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Nepal Protest: नेपाळमध्येसोशल मीडियावर घातलेल्या बंदीच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला आहे. ४ सप्टेंबर रोजी Gen-Z तरुणाई ओली सरकारच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरली होती. काठमांडूमध्ये आंदोलकांच्या गर्दीला तोंड देताना प्रशासनालाही कठीण पावलं उचलावी लागली. रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला. सरकारने ही बंदी  उठवली असली तर अजूनही हिंसक आंदोलने सुरुच आहेत. आता भारताने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सोशल मीडियावरील बंदी आणि सरकारविरोधातील रोष यामुळे नेपाळमध्ये हिंसाचाराने गंभीर वळण घेतले आहे. सोमवारी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात २० जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती बिकट होत असताना, राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भारताने नेपाळमधल्या या संकटावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात मंगळवारी एक निवेदन जारी केले. "आम्ही कालपासून नेपाळमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि अनेक तरुणांच्या जीवितहानीबद्दल खूप दुःखी आहोत. आमच्या संवेदना आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. जवळचा मित्र आणि शेजारी असल्याने, आम्हाला आशा आहे की सर्व संबंधित पक्ष संयम बाळगतील आणि शांततापूर्ण मार्गाने आणि संवादाद्वारे हा प्रश्न सोडवतील, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. "काठमांडू आणि नेपाळच्या इतर अनेक शहरांमध्ये अधिकाऱ्यांनी कर्फ्यू लागू केला आहे याची आम्ही नोंद घेतली आहे. नेपाळमधील भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि नेपाळी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पावले आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे," असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.

दरम्यान, सोमवारी पूर्वेकडील काठमांडू आणि इटहरी शहरात सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला. आंदोलक पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ओली सरकार हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया