शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"तरुणांच्या मृत्यूने दुःख, संयम राखा"; नेपाळमधील हिंसक आंदोलनावर भारताने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:46 IST

नेपाळमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Nepal Protest: नेपाळमध्येसोशल मीडियावर घातलेल्या बंदीच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला आहे. ४ सप्टेंबर रोजी Gen-Z तरुणाई ओली सरकारच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरली होती. काठमांडूमध्ये आंदोलकांच्या गर्दीला तोंड देताना प्रशासनालाही कठीण पावलं उचलावी लागली. रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला. सरकारने ही बंदी  उठवली असली तर अजूनही हिंसक आंदोलने सुरुच आहेत. आता भारताने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सोशल मीडियावरील बंदी आणि सरकारविरोधातील रोष यामुळे नेपाळमध्ये हिंसाचाराने गंभीर वळण घेतले आहे. सोमवारी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात २० जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती बिकट होत असताना, राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भारताने नेपाळमधल्या या संकटावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात मंगळवारी एक निवेदन जारी केले. "आम्ही कालपासून नेपाळमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि अनेक तरुणांच्या जीवितहानीबद्दल खूप दुःखी आहोत. आमच्या संवेदना आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. जवळचा मित्र आणि शेजारी असल्याने, आम्हाला आशा आहे की सर्व संबंधित पक्ष संयम बाळगतील आणि शांततापूर्ण मार्गाने आणि संवादाद्वारे हा प्रश्न सोडवतील, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. "काठमांडू आणि नेपाळच्या इतर अनेक शहरांमध्ये अधिकाऱ्यांनी कर्फ्यू लागू केला आहे याची आम्ही नोंद घेतली आहे. नेपाळमधील भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि नेपाळी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पावले आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे," असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.

दरम्यान, सोमवारी पूर्वेकडील काठमांडू आणि इटहरी शहरात सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला. आंदोलक पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ओली सरकार हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया