शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पृथ्वीवरील सर्वांनाच कोरोना लस मोफत मिळावी, नारायण मूर्तींची 'मन की बात'

By महेश गलांडे | Updated: November 18, 2020 16:08 IST

कोरोना लसीचे उत्पादन सुरू असून बाजारात येताच लसीचा परिमाण सकारात्मक दिसला पाहिजे. तसेच, सर्वांनाच ही लस मोफत दिली गेली पाहिजे, असे मला वाटते

ठळक मुद्देकोरोना लसीचे उत्पादन सुरू असून बाजारात येताच लसीचा परिमाण सकारात्मक दिसला पाहिजे. तसेच, सर्वांनाच ही लस मोफत दिली गेली पाहिजे, असे मला वाटते

मुंबई - कोरोनाच्या लसीसंदर्भातच सध्या सर्वत्र चर्चा सुरू असल्याचं दिसून येतंय. मॉडर्ना आणि फायजर यांसारख्या मोठ्या फार्मास्युटीकल कंपन्यांनाही कोरोना लसीचा रिझल्ट चांगलाच येईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, इन्फोसिसचं संस्थापक नारायणमूर्ती यांनी कोरोना लस देशातील सर्वच नागरिकांना मोफत देण्यात यावी, असे म्हटलंय. बाजारात लस उपलब्ध झाल्यानंतर कुणालाही त्याच्यासाठी पैसे देण्याची वेळ येऊ नये, असेही नारायणमूर्ती यांनी म्हटलं आहे.  

कोरोना लसीचे उत्पादन सुरू असून बाजारात येताच लसीचा परिमाण सकारात्मक दिसला पाहिजे. तसेच, सर्वांनाच ही लस मोफत दिली गेली पाहिजे, असे मला वाटते. पृथ्वीतलावरील सर्वच मनुष्यजातीला ही लस मोफत मिळावी, असे नारायण मूर्ती यांनी म्हटलंय. लस बनविणाऱ्या सर्वच कंपन्यांना संयुक्त राष्ट्र किंवा देशातील सरकारकडून अनुदान दिले पाहिजे. कंपन्यांना फायदा कमविण्यासाठी हे अनुदान नसून लस बनविण्याच्या खर्चाचा मदतनिधी म्हणून द्यावे, असेही मत नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.  

कोरोना लसीसंदर्भात बिहार निवडणुकांवेळी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन बिहारमधील नागरिकांना दिलं होतं. त्यानंतर, भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. केवळ, बिहारचं का, देशातील इतर राज्यात का नाही, असा प्रश्न अनेकांनी केंद्र सरकारला विचारला होता. तसेच, केंद्र सरकार म्हणून देशातील सर्वच नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणे ही जबाबदारी नाही का, असाही प्रश्न विरोधक आणि सुज्ञ नागरिकांनी विचारला होता. 

लॉकडाऊन हटविण्याची केली होती मागणी 

भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील, असे स्पष्ट मत इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी मे महिन्यात केले होते. ते एका उद्योगपतींच्या वेबिनारला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर भारतात लोकसंख्येच्या पाव ते अर्धा टक्का आहे. याउलट ६.६० कोटी लोकसंखा असलेल्या इंग्लंडसारख्या देशात १४,००० बळी कोरोनाने घेतले आहेत, असे मूर्ती यांनी त्यावेळी सांगितले. लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढला असला तरी आतापर्यंत भारताने कोरोना संक्रमितांची संख्या मर्यादित ठेवली आहे व कोरोनाचा आलेख वर जाऊ दिलेला नाही. ३० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजवर फक्त ३१ हजार लोक संक्रमित झाले व त्यापैकी १००७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, याकडेही मूर्ती यांनी तेव्हा लक्ष वेधले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarayana Murthyनारायण मूर्ती