शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला - सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 12:31 IST

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली.

ठळक मुद्देपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली. चीन आणि रशियासमोर भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली.  रशिया, भारत आणि चीन (आरआयसी) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत स्वराज सहभागी झाल्या आहेत. चीन आणि रशियासमोर भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

सुषमा स्वराज यांनी 'पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानला जैश ए मोहम्मद आणि तिथे सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटनांनाविरोधात कारवाई करण्यास सांगत होते. जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारीही घेतली होती. या हल्ल्यात भारताच्या 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला. तरीही पाकिस्तानने 'जैश' विरोधात कोणतेच पाऊल उचलले नाही. याच कारणामुळे भारताला ही कारवाई करावी लागली' अशी माहिती दिली आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद भारतातील अन्य ठिकाणांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारताला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली. त्यानंतरच भारताने जैशच्या तळांवर हल्ले केले, अशी माहिती स्वराज यांनी बैठकीत दिली. कारवाई करताना भारताने योग्य ती काळजी घेतली होती. तसेच हे कोणतेही लष्करी ऑपरेशन नव्हते आणि कोणत्याही लष्करी ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नाही. ही कारवाई संपूर्णपणे दहशतवाद्यांविरोधात होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीमारेषेवर तणाव वाढला, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त

पुलवामा हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने घेतला असून यामुळे गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने आता एलओसीवरील नागरिकांच्या घरांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. घरांआडून पाकिस्तानचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून भारतीय जवानांवर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले करत आहेत. यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. तर पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. नौशेरा आणि बारामुल्ला भागात हे हल्ले करण्यात आले.

मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकSushma Swarajसुषमा स्वराजchinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तान