शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

...म्हणून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला - सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 12:31 IST

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली.

ठळक मुद्देपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली. चीन आणि रशियासमोर भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली.  रशिया, भारत आणि चीन (आरआयसी) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत स्वराज सहभागी झाल्या आहेत. चीन आणि रशियासमोर भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

सुषमा स्वराज यांनी 'पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानला जैश ए मोहम्मद आणि तिथे सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटनांनाविरोधात कारवाई करण्यास सांगत होते. जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारीही घेतली होती. या हल्ल्यात भारताच्या 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला. तरीही पाकिस्तानने 'जैश' विरोधात कोणतेच पाऊल उचलले नाही. याच कारणामुळे भारताला ही कारवाई करावी लागली' अशी माहिती दिली आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद भारतातील अन्य ठिकाणांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारताला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली. त्यानंतरच भारताने जैशच्या तळांवर हल्ले केले, अशी माहिती स्वराज यांनी बैठकीत दिली. कारवाई करताना भारताने योग्य ती काळजी घेतली होती. तसेच हे कोणतेही लष्करी ऑपरेशन नव्हते आणि कोणत्याही लष्करी ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले नाही. ही कारवाई संपूर्णपणे दहशतवाद्यांविरोधात होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीमारेषेवर तणाव वाढला, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त

पुलवामा हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने घेतला असून यामुळे गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने आता एलओसीवरील नागरिकांच्या घरांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. घरांआडून पाकिस्तानचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून भारतीय जवानांवर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले करत आहेत. यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. तर पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. नौशेरा आणि बारामुल्ला भागात हे हल्ले करण्यात आले.

मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकSushma Swarajसुषमा स्वराजchinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तान