शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:20 IST

भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे.

वॉशिंग्टन - भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे. तसेच या तुकड्यांमुळे  आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहत असलेल्या अंतराळवीरांनी धोक्याचा सामना करावा लागू, शकतो, अशी भीती नासाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या मिशन शक्ती चाचणीमुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळात उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारा जगातील चौथा देश बनला होता. दरम्यान, भारताने केलेल्या मिशन शक्तीबाबत नासाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना संबोधित करताना  नासाचे प्रमुख जिम ब्रिडेंस्टाइन यांनी भारताने घेतलेल्या या चाचणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ''भारताच्या क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केलेल्या उपग्रहाचे सगळे तुकडे ट्रॅक करण्याइतपत मोठे नव्हते. सध्या आम्ही ज्या तुकड्यांचा मागोवा घेत आहोत. ते ट्रॅकिंगसाठी पुरेसे आहेत. आम्ही 10 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांबाबत बोलत आहोत. असे सुमारे 60 तुकडे ट्रॅक करण्यात आले आहेत.भारताने आपला 300 किमी उंचीवरील उपग्रह क्षेपणास्राचा मारा करून उद्ध्वस्त केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अन्य महत्त्वाचे उपग्रह ते 300 किमीहून अधिक उंचीवर स्थित आहेत. असे जिम ब्रिडेंस्टाइन यांनी सांगितले. ''या स्फोटात विखुरलेले 24 तुकडे असे आहेत जे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या एपोजीपासून वर जात आहेत. अवशेष एपोजीपासून वर जात असल्याने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. अशा कृतींमुळे भविष्यात मानवाच्या अंतराळ स्वारीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही कृती स्वीकार्य नाही.'' असा इशाराही ब्रिडेंस्टाइन यांनी दिला. 

अमेरिकन सेना अंतराळातील प्रत्येक वस्तूवर लक्ष ठेवून असते. तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अन्य उपग्रहांशी त्यांच्या होऊ शकणाऱ्या संभाव्य टक्करीबाबत इशारा देत असते. सध्या अंतराळात 10 सेंटीमीटरपेक्षा मोठे असलेले सुमारे 23 हजार तुकडे ट्रॅक झाले आहेत. त्यातील 10 हजार तुकडे हे अंतराळातील कचरा असून, 2007 मध्ये चीनने केलेल्या ASAT परीक्षणामुळे सुमारे 3 हजार तुकडे अंतराळात पसरले होते. चीनने हे परीक्षण 2007 मध्ये सुमारे 800 किमी उंचीवरा केले होते.  दरम्यान, ब्रिडेंस्टाइन यांनी सांगितले की, भारताने केलेल्या परीक्षणानंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी असलेला टक्करीचा धोका गेल्या 10 दिवसांमध्ये 44 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र हे तुकडे जसजसे वातावरणात प्रवेश करताना जळून जातील तसतसा हा धोका कमी होईल. 

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीNASAनासाDRDOडीआरडीओIndiaभारत