शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:08 IST

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून युद्धाची भाषा येऊ लागली आहे. तर काश्मीर मुद्दा भारताचा अंतर्गत मामला नाही असं पाकिस्तानकडून जगाला सांगण्यात येत आहे मात्र चीनशिवाय इतर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नसल्याने पाक बिथरला आहे. 

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे. अण्वस्त्र संपन्न दोन्ही देशांचे युद्ध झाले तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशी पोकळ धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर आम्ही त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं इम्रान खान यांनी सांगितले आहे. 

यावेळी इम्रान खान म्हणाले की, आमचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरात कोणती कारवाई केली तर त्याला निपटण्यासाठी सज्ज आहे हे मी मोदींना सांगू इच्छितो. जगाला हे माहित आहे जर अण्वस्त्र संपन्न देशात युद्ध झालं तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. मी ज्यांना भेटतो त्यांना ही गोष्ट आर्वुजून सांगतो असंही त्यांनी सांगितले. 

काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असताना जगातील सर्व देश मौन बाळगतात. सर्व जगाला माहित आहे की, काश्मीरात काय परिस्थिती आहे. काश्मीरात मुस्लीम नसते तर सर्व जग त्यांच्यामागे उभं राहिलं असतं. काश्मीर कठीण संकटातून जात आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. 

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकला नाकारत असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आता ही गोष्ट कबुल केली. भारतीय लष्कर बालाकोटप्रमाणे पीओकेमध्ये काहीतरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सभेच्या वार्षिक सभेत काश्मीर प्रकरण पुन्हा लावून धरणार आहोत. आरएसएस हिंदूंना श्रेष्ठ समजते. त्यामुळे मुस्लिमांना काश्मीरात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे असा आरोपही इम्रान खान यांनी केला.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर