शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:08 IST

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून युद्धाची भाषा येऊ लागली आहे. तर काश्मीर मुद्दा भारताचा अंतर्गत मामला नाही असं पाकिस्तानकडून जगाला सांगण्यात येत आहे मात्र चीनशिवाय इतर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नसल्याने पाक बिथरला आहे. 

शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना काश्मीरच्या प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे. अण्वस्त्र संपन्न दोन्ही देशांचे युद्ध झाले तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशी पोकळ धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. जर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर आम्ही त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं इम्रान खान यांनी सांगितले आहे. 

यावेळी इम्रान खान म्हणाले की, आमचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरात कोणती कारवाई केली तर त्याला निपटण्यासाठी सज्ज आहे हे मी मोदींना सांगू इच्छितो. जगाला हे माहित आहे जर अण्वस्त्र संपन्न देशात युद्ध झालं तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. मी ज्यांना भेटतो त्यांना ही गोष्ट आर्वुजून सांगतो असंही त्यांनी सांगितले. 

काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असताना जगातील सर्व देश मौन बाळगतात. सर्व जगाला माहित आहे की, काश्मीरात काय परिस्थिती आहे. काश्मीरात मुस्लीम नसते तर सर्व जग त्यांच्यामागे उभं राहिलं असतं. काश्मीर कठीण संकटातून जात आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. 

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकला नाकारत असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आता ही गोष्ट कबुल केली. भारतीय लष्कर बालाकोटप्रमाणे पीओकेमध्ये काहीतरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सभेच्या वार्षिक सभेत काश्मीर प्रकरण पुन्हा लावून धरणार आहोत. आरएसएस हिंदूंना श्रेष्ठ समजते. त्यामुळे मुस्लिमांना काश्मीरात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे असा आरोपही इम्रान खान यांनी केला.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर