शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:50 IST

Canada Mark Carney on Hardeep Singh Nijjar Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा ...

Canada Mark Carney on Hardeep Singh Nijjar Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर होते. या शिखर परिषदेव्यतिरिक्त पंतप्रधानांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी विविध मुद्द्यांवर शिखर परिषदेदरम्यान चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही देश उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करतील असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत, दोन्ही नेत्यांनी व्यापारावरील चर्चा पुन्हा सुरू करण्यावरही चर्चा केली. त्यानंतर आता खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बैठकीनंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी याबाबत भाष्य केलं.

जी-७ शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध बिघडवणारा निज्जरच्या हत्येच्या मुद्दाही उपस्थित करण्यात आला, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काहीही बोलताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटलं.  कनानास्किस येथे पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान निज्जर प्रकरणावरील प्रश्नाला उत्तर देताना कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांनी महत्त्वाचे विधान केले.

एका पत्रकाराने कार्नी यांना हरदीप सिंग निज्जर प्रकरणाची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, "आम्ही केवळ संवादच नाही तर कायदा अंमलबजावणी पातळीवर थेट सहकार्याचे महत्त्व यावर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. हे प्रकरण आता न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने, मला अधिक भाष्य करताना सावधगिरी बाळगावी लागेल," असं पंतप्रधान कार्नी म्हणाले.

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीयांचा सहभाग असल्याचे आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर आता पंतप्रधान कार्नी यांनी या मुद्द्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे.

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याची २ वर्षांपूर्वी १८ जून २०२३ रोजी संध्याकाळी कॅनडातील सरे शहरातील गुरुद्वारातून बाहेर पडताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येवर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट भारत सरकारवर निज्जरच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने आपले उच्चायुक्त आणि इतर ५ राजदूतांना कॅनडातून परत बोलावले होते. दरम्यान, मार्क कार्नी पंतप्रधान झाल्यानंतर, खलिस्तानी लोकांनी अलीकडेच कॅनडामध्ये हिंदूविरोधी रॅली काढली होती.  

टॅग्स :CanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत