शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:50 IST

Canada Mark Carney on Hardeep Singh Nijjar Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा ...

Canada Mark Carney on Hardeep Singh Nijjar Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर होते. या शिखर परिषदेव्यतिरिक्त पंतप्रधानांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी विविध मुद्द्यांवर शिखर परिषदेदरम्यान चर्चा केली. यादरम्यान, दोन्ही देश उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करतील असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत, दोन्ही नेत्यांनी व्यापारावरील चर्चा पुन्हा सुरू करण्यावरही चर्चा केली. त्यानंतर आता खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. बैठकीनंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी याबाबत भाष्य केलं.

जी-७ शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध बिघडवणारा निज्जरच्या हत्येच्या मुद्दाही उपस्थित करण्यात आला, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काहीही बोलताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटलं.  कनानास्किस येथे पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान निज्जर प्रकरणावरील प्रश्नाला उत्तर देताना कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांनी महत्त्वाचे विधान केले.

एका पत्रकाराने कार्नी यांना हरदीप सिंग निज्जर प्रकरणाची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, "आम्ही केवळ संवादच नाही तर कायदा अंमलबजावणी पातळीवर थेट सहकार्याचे महत्त्व यावर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. हे प्रकरण आता न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने, मला अधिक भाष्य करताना सावधगिरी बाळगावी लागेल," असं पंतप्रधान कार्नी म्हणाले.

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीयांचा सहभाग असल्याचे आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर आता पंतप्रधान कार्नी यांनी या मुद्द्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे.

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याची २ वर्षांपूर्वी १८ जून २०२३ रोजी संध्याकाळी कॅनडातील सरे शहरातील गुरुद्वारातून बाहेर पडताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येवर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट भारत सरकारवर निज्जरच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने आपले उच्चायुक्त आणि इतर ५ राजदूतांना कॅनडातून परत बोलावले होते. दरम्यान, मार्क कार्नी पंतप्रधान झाल्यानंतर, खलिस्तानी लोकांनी अलीकडेच कॅनडामध्ये हिंदूविरोधी रॅली काढली होती.  

टॅग्स :CanadaकॅनडाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत