शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून दिल्ली-लाहोर बस बंद, व्यापारी संबंधही संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 04:40 IST

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७0 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्याची घोषणा केली आहे.

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७0 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. सोमवारपासून ही बससेवा स्थगित केली जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.फेब्रुवारी १९९९ मध्ये ही बससेवा सुरू करण्यात आली होती. २00१ मध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ही बससेवा निलंबित करण्यात आली होती. २00३ मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानचे संपर्क व डाक सेवामंत्री मुराद सईद यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बुधवारच्या बैठकीतील निर्णयाला सुसंगत निर्णय घेऊन लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्यात येत आहे.’ पाकिस्तानच्या संपर्क मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असल्याचे म्हटले आहे.दिल्ली गेट येथील आंबेडकर स्टेडियम टर्मिनलवरून लाहोर-दिल्ली बस चालविली जाते. दिल्ली परिवहन मंडळाच्या (डीटीसी) बसगाड्या दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसगाड्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी दिल्लीहून लाहोरला रवाना होतात.दरम्यान, पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत तसेच संसदेच्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भारतासोबतचे व्यापारी संबंध संपविण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.पुलवामा अतिरेकी हल्ल्यापासून दोन्ही देशातील संबंध आधीच ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २00 टक्के आयात शुल्क लादले आहे. (वृत्तसंस्था)१६५ प्रवाशांसह पाकला दाखल झाली एक्स्प्रेसकराचीला जाणा-या थड एक्स्प्रेसने शनिवारी शेवटचा प्रवास केला. १६५ प्रवासी असलेल्या या रेल्वेला पुढील प्रवासासाठी पाकिस्तानकडून परवाना मिळाला. ३७0 कलम रद्द केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व रेल्वे सेवा संपुष्टात आणल्या आहेत. जोधपूर-कराची ही दोन्ही देशातील शेवटची रेल्वे असेल, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय सीमेवरील शून्य बिंदूवर (झीरो पॉइंट) पोहोचल्यानंतर प्रवासी दुसºया रेल्वेत बसतील. ४१ वर्षांच्या खंडानंतर १८ फेब्रुवारी २00६ रोजी जोधपूर-कराची या दरम्यान थर एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानकडूनही शनिवारी थड एक्स्प्रेस भारतात दाखल झाली. या रेल्वेची ही अखेरची फेरी होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान