शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:19 IST

China on Kiren Rijiju Statement over Dalai Lama’s Heir: दलाई लामा यांना त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार; भारताची स्पष्टोक्ती

China on Kiren Rijiju Statement over Dalai Lama’s Heir: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा वयाची नव्वदी पूर्ण करणार आहेत, त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अवघ्या जगाचे याकडे लक्ष याकडे लागले आहे. त्यांच्या पश्चात तिबेटी बौद्ध परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने, उत्तराधिकारी हा अतिशय महत्त्वाचा असतो. यातच चीनचा तिबेटवर डोळा असल्याने, या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातोय. दरम्यान, या प्रकरणात भारताने केलेल्या वक्तव्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चीनला ठामपणे सांगितले की, "दलाई लामा यांना त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आहे. दलाई लामांच्या उत्तराधिकारीची निवड केवळ स्थापित परंपरा आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच केली जाईल. यामध्ये इतर कोणालाही अधिकार नाही. चीनने यात हस्तक्षेप करू नये." या वक्तव्यावर आता चीनने आक्षेप घेतला असून, तिबेटशी संबंधित मुद्द्यांवर भारताने सावध विधाने करावी, जेणेकरून द्विपक्षीय संबंधांच्या सुधारणेवर त्याचा परिणाम होणार नाही, असे चीनने म्हटले आहे. नाही.

'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?

रिजिजू यांच्या वक्तव्यावरील प्रश्नाला उत्तर देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने १४ व्या दलाई लामांच्या चीनविरोधी फुटीरतावादी स्वरुपाबद्दल स्पष्ट असले पाहिजे. शिवाय, झिझांग (तिबेट) शी संबंधित मुद्द्यांवर त्याच्या वचनबद्धतेचा आदर करावा. चीन तिबेटला झिझांग म्हणतो. माओ पुढे म्हणाले की, भारताने आपल्या शब्दात आणि कृतीत सावधगिरी बाळगावी. झिझांगशी संबंधित मुद्द्यांवर चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे आणि चीन-भारत संबंधांच्या सुधारणा आणि विकासावर परिणाम करणारे मुद्दे टाळावेत.

दलाई लामांच्या निवडीसाठी चिनी कायदे पाळले पाहिजेत - माओमाओ यांनी चीनच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना म्हटले की, दलाई लामा आणि तिबेटी बौद्ध धर्माचे दुसरे सर्वोच्च धार्मिक नेते पंचेन लामा यांच्या उत्तराधिकारीसाठीची निवड सुवर्ण कलशातून काढलेल्या भाग्य पत्रानुसार आणि केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार कठोर धार्मिक विधी आणि ऐतिहासिक परंपरांनुसार असावी. सध्याचे १४ वे दलाई लामा या प्रक्रियेतून गेले होते आणि तत्कालीन केंद्र सरकारने त्यांना मान्यता दिली होती. दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडताना ही तत्त्वे, धार्मिक विधी, ऐतिहासिक परंपरा, चिनी कायदे आणि नियमांचे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीनIndiaभारत