शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

CoronaVirus News: मास्कमुळे कोरोना संसर्ग टळला; वाचले अनेक नागरिकांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:50 IST

इटली व न्यूयॉर्कमध्ये मास्क घालणे बंधनकारक केल्यानंतर तिथे कोरोना साथीच्या फैलावामध्ये घट झालेली दिसून आली.

वॉशिंग्टन : कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या ठिकाणी तोंडावर मास्क घातल्याने हजारो जण या विषाणूची बाधा होण्यापासून वाचले असे एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे या आजाराविरोधातील लढाईत मास्क हे एक प्रमुख साधन आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.त्यासंदर्भात अमेरिकेतील नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ सायन्सेसच्या प्रकाशनामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, फिजिकल डिस्टन्सिंग पाळून किंवा घरीच थांबल्यामुळे कोरोनाच्या संसगार्चा धोका नक्कीच टाळता येतो. मात्र मास्क घालणे हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे. इटली व न्यूयॉर्कमध्ये मास्क घालणे बंधनकारक केल्यानंतर तिथे कोरोना साथीच्या फैलावामध्ये घट झालेली दिसून आली.न्यूयॉर्कमध्ये मास्क घालणे सक्तीचे केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दररोजच्या प्रमाणात ३ टक्के घट झाली. इटलीमध्येही अशाच प्रकारे घट झाल्याचे आढळून आले. मास्क घालणे बंधनकारक करण्याआधी इटली, न्यूयॉर्कमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, क्वारंटाइन, सॅनिटायझिंग हे सारे उपाय करण्यात येत होते. मात्र मास्क घातल्याने जेवढा संसर्ग कमी झाला तो अन्य उपायांनी फारसा झाला नाही असे एका पाहणीत आढळून आले.मास्कच्या प्रचारासाठी कार्यक्रम आयोजित कराहवेतून विषाणूचा संसर्ग होण्याला मास्क मुळे अटकाव होतो. या मास्कनी हजारो लोकांचे प्राण वाचविले आहेत. मास्क वापरण्याचा प्रचार करणारे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन यू. एस. सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने शुक्रवारी तेथील जनतेला केले आहे. (वृत्तसंस्था)...तर भारतातही नियंत्रण मिळवणे शक्यपुणे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर यांच्यापेक्षाही मास्कचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरत आहे. लोकांनी योग्य मास्कचा वापर केला तर कोरोनाची लागण होण्याचा धोका फार कमी असतो असे अभ्यासातून पुढे आले आहे. भारताची मोठी लोकसंख्या पाहता येथील नागरिकांनी मास्कचा वापर केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्क घातल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्य आहे. भारतात मास्कचा शंभर टक्के वापर झाल्यास कोरानावर नियंत्रण मिळवणे शक्य असून, नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या