शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

coronavirus: आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या घरवापसीसाठी मराठी उद्योगपतीचा पुढाकार, केली विमानांची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:45 IST

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशात गेलेल्या भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मराठी उद्योगपती धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे आखाती देशातील अनेक भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेतत्यांना भाड्याची घरे सोडून रस्त्यावर राहावे लागत आहे. त्यामुळे अशा लोकांसमोर भारतात परतण्यावाचून पर्याय राहिलेला नाहीआखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांमध्ये गरोदर महिला, मुले, पर्यटक आणि अल्पकालीन व्हिसा घेऊन आलेल्यांचा समावेश आहे

दुबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. लॉकडाऊनमुळे भारतातील मोठ्या शहरात अडकून पडलेल्या गोरगरीब मजुरांच्या हालअपेष्टा तुम्ही पाहिल्याच असतील. या मजुरांप्रमाणेच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशात गेलेल्या भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मराठी उद्योगपती धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला आहे.

दुबईस्थित मसाला किंग धनंजय दातार यांनी आखाती देशात आपले उद्योगविश्व निर्माण केले आहे. मसाला किंग या नावाने ते ओळखले जातात. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये राहणारे भारतीय मायदेशी परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतात जाण्यासाठी परतीचे तिकीट मिळवण्यासाठी हजारो भारतीय नागरिक भारतीय वकिलातीसमोर रांगा लावत आहेत, असा लोकांच्या मदतीसाठी दातार पुढे आले आहेत.

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे आखाती देशातील अनेक भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच त्यांना भाड्याची घरे सोडून रस्त्यावर राहावे लागत आहे. त्यामुळे अशा लोकांसमोर भारतात परतण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

याबाबत धनंजय दाता म्हणाले की, आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांमध्ये गरोदर महिला, मुले, पर्यटक आणि अल्पकालीन व्हिसा घेऊन आलेल्यांचा समावेश आहे. अशा अडकून पडलेल्या ३ हजार भारतीयांच्या केरळ, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, लखनौ, गोवा आणि चंदिगड येथे जाण्याची व्यवस्था मी केली आहे.

 दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्रामधील सुमारे ६० हजार लोक इकडे अडकून पडले आहेत. त्यांच्याबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच याबाबत केंद्राला पत्र लिहून या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.

 मुंबई आणि महाराष्ट्रातील या नागरिकांच्या मयदेशी परतण्यासाठी उद्धव ठाकरे वैयक्तिकरीत्या पुढाकार घेऊन विमानांना वंदे भारत मोहिमेंतर्गत मुंबईत येण्याची परवानगी देतील, अशी अपेक्षा धनंजय दातार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र