शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: आखाती देशात अडकलेल्या भारतीयांच्या घरवापसीसाठी मराठी उद्योगपतीचा पुढाकार, केली विमानांची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:45 IST

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशात गेलेल्या भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मराठी उद्योगपती धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे आखाती देशातील अनेक भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेतत्यांना भाड्याची घरे सोडून रस्त्यावर राहावे लागत आहे. त्यामुळे अशा लोकांसमोर भारतात परतण्यावाचून पर्याय राहिलेला नाहीआखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांमध्ये गरोदर महिला, मुले, पर्यटक आणि अल्पकालीन व्हिसा घेऊन आलेल्यांचा समावेश आहे

दुबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. लॉकडाऊनमुळे भारतातील मोठ्या शहरात अडकून पडलेल्या गोरगरीब मजुरांच्या हालअपेष्टा तुम्ही पाहिल्याच असतील. या मजुरांप्रमाणेच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशात गेलेल्या भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मराठी उद्योगपती धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला आहे.

दुबईस्थित मसाला किंग धनंजय दातार यांनी आखाती देशात आपले उद्योगविश्व निर्माण केले आहे. मसाला किंग या नावाने ते ओळखले जातात. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये राहणारे भारतीय मायदेशी परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतात जाण्यासाठी परतीचे तिकीट मिळवण्यासाठी हजारो भारतीय नागरिक भारतीय वकिलातीसमोर रांगा लावत आहेत, असा लोकांच्या मदतीसाठी दातार पुढे आले आहेत.

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे आखाती देशातील अनेक भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच त्यांना भाड्याची घरे सोडून रस्त्यावर राहावे लागत आहे. त्यामुळे अशा लोकांसमोर भारतात परतण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

याबाबत धनंजय दाता म्हणाले की, आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांमध्ये गरोदर महिला, मुले, पर्यटक आणि अल्पकालीन व्हिसा घेऊन आलेल्यांचा समावेश आहे. अशा अडकून पडलेल्या ३ हजार भारतीयांच्या केरळ, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, लखनौ, गोवा आणि चंदिगड येथे जाण्याची व्यवस्था मी केली आहे.

 दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्रामधील सुमारे ६० हजार लोक इकडे अडकून पडले आहेत. त्यांच्याबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच याबाबत केंद्राला पत्र लिहून या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.

 मुंबई आणि महाराष्ट्रातील या नागरिकांच्या मयदेशी परतण्यासाठी उद्धव ठाकरे वैयक्तिकरीत्या पुढाकार घेऊन विमानांना वंदे भारत मोहिमेंतर्गत मुंबईत येण्याची परवानगी देतील, अशी अपेक्षा धनंजय दातार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र