शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 08:49 IST

दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देचिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. 

बीजिंगः जगातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे कोलमडली आहे. दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगविश्वात चीनला मागे टाकत ते स्थान मिळवण्याचा भारताचा मानस आहे. त्यावरूनच चीननं आता भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपले उत्पादन युनिट चीनमधून भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून चीनची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. याशिवाय अनेक कंपन्या चीनबाहेर जाण्याचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशने चीनमधील अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक टास्क फोर्सची स्थापना केली आहे.भारत कधीही यशस्वी होणार नाहीः ग्लोबल टाईम्सएवढे प्रयत्न करूनही कोरोना साथीच्या काळात आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर चीनला मागे ठेवून भारत जगातील उद्योगविश्वाचा कारखाना होण्याची शक्यता नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, पण ही फक्त देशाप्रति असलेली काही लोकांची विचारसरणी आहे. तो राष्ट्राभिमान आहे, बाकी काही नाही. अशा अभिमानाने आर्थिक बाबींच्या पलीकडे जाऊन आपण सैन्य स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. ज्यामुळे काही लोकांना वाटतं की आता ते चीनच्या सीमेवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवतील. चीनचा सामना करू शकतील. असे विचार भारतासाठी निःसंशयपणे धोकादायक आणि दिशाभूल करणारे आहेत. आतापर्यंत चीनच्या सीमा संरक्षण दलांनी सीमा नियंत्रण उपायांना चालना दिली आहे. गॅल्वान व्हॅली भागातील सीमा नियंत्रण परिस्थितीत एकतर्फी बदल करण्याच्या भारताच्या नुकत्याच केलेल्या प्रयत्नाला उत्तर देताना आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत, असंही या चिनी वृत्तपत्रात लिहिलेलं आहे. चिनी वृत्तपत्र लिहितो की, पाश्चिमात्य माध्यमांनीही यावेळी चीनच्या बाजाराच्या संभाव्यतेची तुलना करून भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह दाखविला आहे, ज्यामुळे काही भारतीय वास्तविक परिस्थितीपासून संभ्रमित झाले आहेत. सध्या भारत चीनची जागा घेईल, असा विचारदेखील अकल्पनीय आहे.चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे भारताला औद्योगिक स्तरावर आकर्षित करण्याची संधी मिळेल असे वाटते, पण दक्षिण आशियाई देशांमध्ये त्यांच्या निकृष्ट पायाभूत सुविधांची कमतरता, कुशल कामगार नसणे आणि परकीय गुंतवणुकीच्या कठोर बंधनामुळे अशी संधी मिळणं अवघडच आहे.  भारत पुढील जागतिक कारखाना होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी सरकारनेही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या उद्दिष्टांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत, ज्याचा जगावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. भौगोलिक राजनैतिक पद्धतींमध्ये ड्रॅगन आणि आशियातील हत्ती यांच्यातील लढाई वेगाने विकसित होत आहे, परंतु दोन प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा एकत्र येण्याचा मार्ग शोधू शकतील आणि या प्रक्रियेदरम्यान, व्यावहारिकतेसह भारतीय अर्थव्यवस्थेने त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक असल्याचाही सल्ला ग्लोबल टाइम्सनं दिला आहे. 

हेही वाचा

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारत