शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 08:49 IST

दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देचिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. 

बीजिंगः जगातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे कोलमडली आहे. दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगविश्वात चीनला मागे टाकत ते स्थान मिळवण्याचा भारताचा मानस आहे. त्यावरूनच चीननं आता भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपले उत्पादन युनिट चीनमधून भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून चीनची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. याशिवाय अनेक कंपन्या चीनबाहेर जाण्याचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशने चीनमधील अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक टास्क फोर्सची स्थापना केली आहे.भारत कधीही यशस्वी होणार नाहीः ग्लोबल टाईम्सएवढे प्रयत्न करूनही कोरोना साथीच्या काळात आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर चीनला मागे ठेवून भारत जगातील उद्योगविश्वाचा कारखाना होण्याची शक्यता नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, पण ही फक्त देशाप्रति असलेली काही लोकांची विचारसरणी आहे. तो राष्ट्राभिमान आहे, बाकी काही नाही. अशा अभिमानाने आर्थिक बाबींच्या पलीकडे जाऊन आपण सैन्य स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. ज्यामुळे काही लोकांना वाटतं की आता ते चीनच्या सीमेवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवतील. चीनचा सामना करू शकतील. असे विचार भारतासाठी निःसंशयपणे धोकादायक आणि दिशाभूल करणारे आहेत. आतापर्यंत चीनच्या सीमा संरक्षण दलांनी सीमा नियंत्रण उपायांना चालना दिली आहे. गॅल्वान व्हॅली भागातील सीमा नियंत्रण परिस्थितीत एकतर्फी बदल करण्याच्या भारताच्या नुकत्याच केलेल्या प्रयत्नाला उत्तर देताना आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत, असंही या चिनी वृत्तपत्रात लिहिलेलं आहे. चिनी वृत्तपत्र लिहितो की, पाश्चिमात्य माध्यमांनीही यावेळी चीनच्या बाजाराच्या संभाव्यतेची तुलना करून भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह दाखविला आहे, ज्यामुळे काही भारतीय वास्तविक परिस्थितीपासून संभ्रमित झाले आहेत. सध्या भारत चीनची जागा घेईल, असा विचारदेखील अकल्पनीय आहे.चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे भारताला औद्योगिक स्तरावर आकर्षित करण्याची संधी मिळेल असे वाटते, पण दक्षिण आशियाई देशांमध्ये त्यांच्या निकृष्ट पायाभूत सुविधांची कमतरता, कुशल कामगार नसणे आणि परकीय गुंतवणुकीच्या कठोर बंधनामुळे अशी संधी मिळणं अवघडच आहे.  भारत पुढील जागतिक कारखाना होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी सरकारनेही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या उद्दिष्टांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत, ज्याचा जगावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. भौगोलिक राजनैतिक पद्धतींमध्ये ड्रॅगन आणि आशियातील हत्ती यांच्यातील लढाई वेगाने विकसित होत आहे, परंतु दोन प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा एकत्र येण्याचा मार्ग शोधू शकतील आणि या प्रक्रियेदरम्यान, व्यावहारिकतेसह भारतीय अर्थव्यवस्थेने त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक असल्याचाही सल्ला ग्लोबल टाइम्सनं दिला आहे. 

हेही वाचा

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारत