शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 1:21 PM

काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा घेऊन गेल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर केला जाऊ लागला आहे. जगातील इतर देशांमध्ये चीनशिवाय कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. 

अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीद सईद यांचे पोस्टर्स लाहोरमध्ये लागले आहेत. त्यामुळे भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का असा सवाल सर्वांच्या मनात निर्माण होईल. काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनादिवशी हे पोस्टर्स संपूर्ण लाहोर शहरात आणि पाकिस्तानातील काही भागात झळकले होते. यात निळ्या अक्षरात हाफिज मोहम्मद सईद लिहिलं आहे तर पिवळ्या अक्षरात जश्न ए आजादी मुबारक असं लिहिलं आहे. 

एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याचं नाटक करायचं तर दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना खतपाणी घालयाचं हे उद्योग करणाऱ्या पाकचा बुरखा या पोस्टर्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा फाटला आहे. लाहोर शहरात लागलेल्या या पोस्टर्सवरून हाफिज सईदसोबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे किती जवळचे संबंध आहेत हे स्पष्ट होतं. पाकिस्तानी सरकारकडून त्या देशात कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांना पाठबळ दिलं जातं. त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात आहे. मात्र हाफिज सईदला जेलमध्ये टाकल्याचं सांगत आलीशान गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच बाकी दहशतवाद्यांना अंडरग्राऊंड राहण्याचं फर्मान सोडले आहे. पाकिस्तान स्वत:वरील आरोप कितीही फेटाळून लावत असले तरी दरवेळी पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतोच. या पोस्टर्सवरून हाफिज सईदला हाताशी घेत भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रचत आहेत का? हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. 

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते की, त्यांच्या देशातील आधीच्या सरकारने कधी सत्य समोर आणलं नाही की, पाकिस्तानात 40 वेगवेगळे दहशतवादी गट सक्रीय आहेत. मात्र पाकिस्तान दहशतवाद या विषयाकडे किती गांभीर्याने पाहते हे या पोस्टर्समधून समोर येत आहे.  

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीhafiz saedहाफीज सईदImran Khanइम्रान खानIndiaभारत