शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

पाकिस्तानात गृहयुद्ध पेटवण्याचं मोठं षडयंत्र; पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 07:39 IST

आता पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. एबटाबादच्या रॅलीत इमरान खान यांनी पाकविरोधात मोठं षडयंत्र रचल्याचा दावा केला

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. इमरान खान(Imran Khan) देशातच अंतर्गत युद्ध करण्यासाठी प्लॅन बनवत आहेत असा मोठा दावा पंतप्रधान शरीफ यांनी केला आहे. देशातील राष्ट्रीय संस्थांविरोधात बेबनाव केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. अलीकडेच इमरान खान यांनी एका सभेत सरकारी संस्थांवर बोचरी टीका केली होती.

नुकतेच इमरान खान यांचं सरकार पाडण्यात लष्कराच्या भूमिकेवर टीका होत आहे. ६९ वर्षीय क्रिकेटर ते पंतप्रधान बनलेले इमरान खान यांच्याविरोधात मागील महिन्यात अविश्वास प्रस्ताव आणून त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यात आले. इमरान समर्थकांनी सरकार पाडण्याच्या लष्काराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभारले. आता पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. एबटाबादच्या रॅलीत इमरान खान यांनी पाकविरोधात मोठं षडयंत्र रचल्याचा दावा केला. शहबाज शरीफ म्हणाले की, इमरान खान यांनी जे विधान केले आहेत ते गंभीर आहेत. ते देशातील जनतेच्या मनात विष पेरत आहेत. देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करतायेत. या विधानाला संविधान आणि कायद्यानुसार बंद करायला हवे असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते इमरान खान?

इमरान खान यांनी सभेत म्हटलं की, सिराज उद दौला मुघल सम्राटद्वारे नियुक्त बंगालचा गर्व्हनर होता आणि त्याचा कमांडर मीर जाफरने दौला सरकार पाडण्यासाठी इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचप्रकारे आजचे मीर जाफर आणि मीर सादिक यांनी सरकार पाडले. मीर सादिक टीपू सुल्तानचे सेनापती होते. ज्यांनी म्हैसूर शासक टीपूला हरवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला शामिल झाले होते.

हे पाकिस्तानविरोधात मोठं षडयंत्र – पंतप्रधान

इमरान खान यांच्या विधानावर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भाष्य करत सांगितले की, इमरान खान यांचे विधान खूप भयंकर आणि धोकादायक आहे. त्यांनी थेटपणे पाकिस्तानी संस्था, सुप्रीम कोर्ट, लष्कराची तुलना मीर जाफर आणि मीर सादिक याच्याशी केली. राष्ट्रीय संस्थांबाबत इमरान खान यांनी जे वक्तव्य केले ते पाकिस्तानविरोधात मोठं षडयंत्र आहे. कायद्याने हे थांबवायला हवे. नाहीतर सीरिया आणि लीबियाप्रमाणे पाकिस्तानची अवस्था होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान