शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

आसामवरही महापुराचे ढग; चीन ब्रह्मपुत्रेमध्ये सोडणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 8:50 PM

नदीमधील पाण्याची पातळी गेल्या 50 वर्षांपेक्षा सर्वाधिक स्तरावर आहे.

नवी दिल्ली : भारताला प्रत्येकवेळी संकटात टाकणाऱ्या चीनने आता पाण्याच्या रुपात आणखी एक संकट उभे केले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून हे पाणी लवकरच ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सोडणार असल्याचा इशारा चीनने दिला आहे. यामुळे आसाममध्ये पूर येण्याची शक्यता आहे. 

चीनच्या इशाऱ्य़ानंतर आसामच्या डिब्रूगडमधील अधिकाऱ्यांना जिल्हा मुख्यालय न सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. चीनने जर नदीमध्ये पाणी सोडले तर पाण्याची पातळी वाढू शकते. यामुळे आसाममध्ये महापुराचा धोका उद्भवू शकतो. अरुणाचल प्रदेशचे खासदार निनोंग एरिंग यांनीही पुराचा इशारा दिला गेला असल्याचे सांगितले. 

अरुणाचल प्रदेशच्याही सरकारला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून येते. चीनमध्ये तिला सांग्पो या नावाने ओळखले जाते. सध्या या नदीमधील पाण्याची पातळी गेल्या 50 वर्षांपेक्षा सर्वाधिक स्तरावर आहे. यामुळे चीन पाणी सोडण्याची शक्यता जास्त आहे. 

एका करारानुसार चीन ब्रह्मपुत्रेमध्ये पाणी सोडण्याबाबतचे इशारे मे ते ऑक्टोबर दरम्यान देतो. यामुळे तेथील राज्यांना सतर्क करता येते. मात्र, गेल्या वर्षीच्या डोकलाम वादामुळे चीनने हे इशारे देणे बंद केले होते. मात्र, यंदा पुन्हा चीनने इशारा देत भारताला सावध केले आहे. 

टॅग्स :AssamआसामfloodपूरchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश