शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चीनने गंडवले?, कोरोना लसीनंतरही मृत्यू; संशोधनातून समोर आले धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 9:24 AM

चीनने तयार केलेली लस घेतल्यानंतरही कोरोना मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मलेशियामध्ये ७३ टक्के आहे. संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

चीनचा माल म्हणजे बनावट’ हे आपल्याकडे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे स्वस्तात मिळत असल्या तरी चिनी वस्तू खरेदी करताना भारतीय अनेकदा विचार करतात. हाच प्रत्यय नव्याने येऊ लागला असून, धक्कादायक गोष्ट म्हणजे चीनच्या लसीही बनावट असल्याची शंका निर्माण होऊ लागली आहे. कारण चीनने तयार केलेली लस घेतल्यानंतरही कोरोना मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मलेशियामध्ये ७३ टक्के आहे. संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

नेमके काय आले समोर?

तीन कोटी लोकांचा देश असलेल्या मलेशियामध्ये १ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या काळात कोरोनाने सात हजार ६३६ मृत्यू झाले आहेत. त्यातील २१५९ लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे  यातील ७३ टक्के लोक  म्हणजे १५७३ लोकांनी चीनने तयार केलेली सिनोवॅक लस घेतली होती.

फायझरचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचे हेच प्रमाण २५ टक्के तर ॲस्ट्राझेनेकाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मलेशियात ३६ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या काळात मलेशियामध्ये झालेल्या ७६३६ कोरोना मृत्यूंपैकी ४,०७६ लोकांनी कोणतीही लस घेतली नव्हती. १४०१ लोकांचा दुसरा डोस घेणे बाकी होते.

चीनच्या लसीमुळे वाढली अनेक देशांची चिंता

४३ देशांना ७६ कोटी सिनोवॅक लसीचा पुरवठा चीनने केला आहे. या सर्व देशांची चिंता आता वाढली असेल. ७६ देशांना चीनच्या सिनोफार्मा या कंपनीने कोट्यवधी डोस दान केले आहेत.

चीनच्या लसीनंतरही मृत्यू कशामुळे ?

मलेशियामध्ये २४ फेब्रुवारीपासून लसीकरण सुरू झाले आणि सुरुवातीला मोठ्या प्रमाणात चीनची सिनोवॅक लस वापरण्यात आली.दोन्ही डोस पूर्ण होऊन अनेक जणांना काही महिने झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी झाली असावी, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

भारतातील काय स्थिती

आयसीएमआरच्या माहितीनुसार भारतात दोन्ही डोस पूर्ण केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ ०.४ टक्के आहे. ६७७ कोरोना रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCorona vaccineकोरोनाची लस