शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवा, चीनने दिला पाकिस्तानला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 23:13 IST

गेल्या काही काळापासून पाकिस्तानची सातत्याने पाठराखण करणाऱ्या चीनने काश्मिरप्रश्नी पाकिस्तानला धक्का दिला आहे. काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवसा गेला पाहिजे असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. तसेच या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची इस्लामिक सहकार्य संघटनांनी केलेली मागणी फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली, दि. २२ - गेल्या काही काळापासून पाकिस्तानची सातत्याने पाठराखण करणाऱ्या चीनने काश्मिरप्रश्नी पाकिस्तानला धक्का दिला आहे. काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवसा गेला पाहिजे असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. तसेच या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची इस्लामिक सहकार्य संघटनांनी केलेली मागणी फेटाळून लावली आहे. महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोडबाबत चीन चिंतीत आहे. त्यामुळे त्याच्या धोरणात बदल झाल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान, काल भारताने काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला चांगलेच खडसावले होते. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे. याआधी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला.भारताकडून राजदूत एनम गंभीर यांनी मोर्चा सांभाळला. त्या बोलल्या आहेत की, 'टेररिस्तान बनलेल्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद फैलावत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचा प्रभाव पडत आहे. पाकिस्तानची पवित्र जमीन मिळवण्याच्या नादात पाकिस्तान दहशतवादाची पवित्र जमीन झाली आहे. आपल्या छोट्याश्या इतिहासात पाकिस्तान दहशतवादासाठी पर्याय ठरला आहे'. यापुढे बोलताना एनम गंभीर यांना पाकिस्तानला सुनावलं की, 'ज्या देशाने ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरसारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला, तो देश स्वत:ला पीडित म्हणवण्याचं धाडस करत आहे'.काश्मीर मुद्यावर बोलतानाही एनम गंभीर यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. 'जम्मू काश्मीर नेहमी भारताचा अविभाज्य घटक असेल हे पाकिस्तानने लक्षात ठेवलं पाहिजे. पाकिस्तानने दहशतवादाला कितीही खतपाणी घातलं, तरी भारताच्या अखंडतेला धक्का लावण्यात त्यांना यश मिळणार नाही', असं एनम गंभीर बोलल्या आहेत.पाकिस्ताच्या जमिनीवर दहशतवाद्यांना मिळणा-या आश्रयावर बोलताना एनम गंभीर बोलल्या की, 'ज्या पाकिस्तानात दहशतवादी बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरताना दिसतात, त्यांना आम्ही भारताच्या मानवाधिकारावर सल्ला देताना आम्ही पाहिलं आहे'. पुढे बोलताना एनम गंभीर यांनी सांगितलं की, 'देशाला लोकशाही आणि मानवाधिकारावर अशा देशाकडून शिकवण घेण्याची गरज नाही, ज्याला अपयशी देश म्हणून ओळखलं जातं'.कोण आहेत एनम गंभीर ?एनम यांनी ट्विटरवर आपण भारतीय राजदूत असून दिल्लीमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे. फेसबूकवर त्यांनी आपण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ जिनीवामधून शिक्षण पुर्ण केलं आहे. सध्या त्या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या 2005 बॅचमधील आयएफएसच्या (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) अधिकारी आहेत.

 

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू काश्मिर