शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

भारताचं पाणी चीन पळवणार?; ड्रॅगनची नवी चाल, सीमेवर संघर्ष पेटण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 12:39 IST

पॉवर कंस्ट्रेक्शन कॉर्पोरेशन ऑफ चाइनाने हा विद्युत जलप्रकल्प ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटलंय.

बीजिंग – भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा दोन्ही देशांत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. चीनने तिबेटमध्ये सीमेजवळ यारलुंग-त्संगपो नदीवर एक धरण बांधण्याची योजना आखत आहे. या नदीला भारतात ब्रह्मपूत्र नावाने ओळखलं जाते. ही सर्वात मोठी नदी आहे. भारत-चीन संबंधाचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक ब्रह्मा चेलानी यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे.

निक्केई एशियामध्ये याबाबत लेख आला आहे. त्यानुसार, चीन जगातील सर्वात मोठे धरण गुप्तरित्या बांधू शकत नाही. जर हे खरे असेल तर या धरणाची क्षमता ६० गीगावॉट इतकी आहे. हे धरण चीनच्या मेगा प्रोजेक्टचा एक भाग आहे. भारतानजीक सीमेवर चीनचे हे धरण आकार आणि क्षमतेने चीनमधीलच थ्री गॉर्जेस धरणाहून कित्येक पटीने मोठे असेल. थ्री गॉर्जेस धरणावर जगातील सर्वात मोठी विद्युत योजना आहे. ब्रह्मपूत्र नदीवर धरण बांधून चीनचा विद्युत निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. ज्याठिकाणाहून एक नदी भारतात येते. नोव्हेंबर २०२० मध्ये धरण बांधकामाची बातमी समोर आली होती. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये ही बातमी आली होती.

कैलास पर्वतातील एंगसी ग्लेशियरहून निघालेली आणि पूर्व हिमालयाला घेरा घातलेली ब्रह्मपूत्र नदी ३,६९६ किमी लांब आहे. भारताच्या सीमेपलीकडे चीनमध्ये या नदीला यारलुंग-त्संगपो नावाने बोलतात. ही नदी वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे जाते. तिबेटहून ही भारतात येते आणि शेवट बांग्लादेशात होतो. ११०० किलोमीटर पूर्वेला वाहून त्यानंतर अनेक नद्या या नदीला मिसळतात. हिमालयाच्या पूर्वेच्या टोकापासून पर्वतरांगा पार करून दरीखोऱ्यातून रस्ता बनवत चीनला क्रॉस करून दक्षिणेकडे वळण घेते. हा भाग एलएसी अंतर्गत येतो. ही जगातील नववी सर्वात मोठी नदी आहे.

भारतासाठी धोकादायक  

चीन यारलुंग-त्सांगपो नदीवर एक विद्युत प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करतोय. ही नदी भारत आणि बांग्लादेशातूनही जाते. पॉवर कंस्ट्रेक्शन कॉर्पोरेशन ऑफ चाइनाने हा विद्युत जलप्रकल्प ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटलंय. चीन भारतातील काही भागातील पाणी कमी करण्यासाठी नदीचा प्रवाह उत्तरेच्या दिशेने वळवू शकतो. जर असे झाले तर भारतासाठी ही स्थिती धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन