शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

China Coronavirus : चीनमधील मृतांची संख्या ३६१; आतापर्यंत १७,२०५ लोकांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:18 IST

चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे आणखी ५७ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर बळींची संख्या ३६१ वर पोहोचली आहे

बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे आणखी ५७ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर बळींची संख्या ३६१ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत १७,२०५ लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी दैनिक अहवालात म्हटले आहे की, २ फेब्रुवारी रोजी कोरोनाचे २८२९ नवे प्रकरणे समोर आले आहेत. संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या आता १७,२०५ झाली आहे. ज्या ५७ लोकांचा मृत्यू झाला आहे त्यातील ५६ हुबई प्रांतातील आहेत, तर एक व्यक्ती चोंगकिंगमधील आहे.

कोरोनाचे सर्वाधिक बळी हुबेई प्रांतात झाले आहेत. रविवारी आणखी ५१७३ संशयित रुग्ण समोर आले आहेत. रविवारी १८६ जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. १४७ लोकांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. सध्या २२९६ लोकांची प्रकृती गंभीर झाली आहे, असे सांगितले जात आहे की, कोरोना विषाणू हा विषाणूंचा एक मोठा समूह आहे; पण यातील केवळ सहा विषाणू लोकांना संसर्ग करतात. याच्या प्रभावाने सर्दी होते.

‘सार्स’मुळे २००२-०३ मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये जवळपास ६५० लोकांचा मृत्यू झाला होता.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनसोबतची सीमा बंद करण्याची मागणी करत हाँगकाँगच्या शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. हाँगकाँगमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे १५ प्रकरणे समोर आले आहेत. यातील बहुतांश लोक चीनहून आलेले आहेत.

१० दिवसांत हॉस्पिटल

कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी चीनने केवळ १० दिवसांत हॉस्पिटल उभारले असून, सोमवारी या ठिकाणी रुग्णांची भरती सुरूझाली आहे.चीनच्या वुहान शहरातून या विषाणूंचा प्रसार सुरूझाला होता. १५०० बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी रात्रंदिवस काम करण्यात आले. वुहानसाठी १४०० डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी पाठविण्यात आले आहेत.या शहराची लोकसंख्या १ कोटी १० लाख आहे. संक्रमणाच्या भीतीमुळे लोकांना कुठेही ये-जा करण्यासाठी निर्बंध आहेत. यापूर्वी २००३ मध्ये सार्सचा संसर्ग झाला होता. त्यासाठी एका आठवड्यात उपचार केंद्र उभे केले होते.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू