शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 09:24 IST

माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते.

ठळक मुद्देगलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात - चीन15 जूनच्या रात्री भारतीय सैनिकांनीच करार तोडून एलएसी ओलांडली आणि चिनी सैनिकांवर हल्ला केला - चीनचिनने गलवान खोऱ्यावर दावा करण्याच्या एक दिवस आधीच भारताने गलवान घाटीवरील चिनी सेन्याच्या सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावला होता.

पेइचिंग :चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दावा केला, की गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चिनी हद्दीत येते. एवढेच नाही, तर 15 जूनच्या रात्री भारतीय सैनिकांनीच करार तोडून एलएसी ओलांडली आणि चिनी सैनिकांवर हल्ला केला.

चिनने गलवान खोऱ्यावर दावा करण्याच्या एक दिवस आधीच भारताने गलवान घाटीवरील चिनी सेन्याच्या सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावला होता. तसेच आपल्या हालचाली एलएसीच्या आतच ठेवा, असे सांगितले होते. गलवान खोऱ्यातील चीनचा दावा भारताने आधिच फेटाळून लावला आहे. भारताने म्हटले आहे, की अशा प्रकारचा खोटा दावा करणे, 6 जूनला झालेल्या उच्च स्तरीय सैन्य बैठकीत झालेल्या सहमतीविरोधात आहे.

India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी

चीन म्हणतोय गलवान खोरे आमचा भाग -माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते. अनेक वर्षांपासून तेथे चीनी सैनिक गस्त घालत आहेत.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

भारताने करार तोडला -चीनने दावा केला, की सोमवारी रात्री भारतीय सैनिक करार तोडून चीनच्या सीमेत घुसले आणि त्यांनी त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला केला. यानंतर तेथे हिंसक चकमक उडाली आणि सैन्याचे मोठे नुकसान झाले. भारतीय सेनिकांनी दोन्ही देशांतील कराराचे, तसेच आंतरराष्ट्रीय संबंध नियंत्रित करणाऱ्या मुलभूत मानदंडांचे उल्लंघन केले आहे.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

लवकरात लवकर बोलणी व्हावी -चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवरील एका प्रेस नोटमध्ये झाओ यांनी म्हटले आहे, या भागातील परिस्थितीवर मात करण्यासाठी लवकरात लवकर कमांडर स्तरावरील दुसरी बैठक व्हायला हवी. भारत आणि चिनी राजदूत तसेच सैन्य तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करत आहेत.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यामुळे सीमेवरील तणाव  अधिक वाढला आहे. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता. 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनladakhलडाखSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान