शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 09:24 IST

माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते.

ठळक मुद्देगलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात - चीन15 जूनच्या रात्री भारतीय सैनिकांनीच करार तोडून एलएसी ओलांडली आणि चिनी सैनिकांवर हल्ला केला - चीनचिनने गलवान खोऱ्यावर दावा करण्याच्या एक दिवस आधीच भारताने गलवान घाटीवरील चिनी सेन्याच्या सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावला होता.

पेइचिंग :चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दावा केला, की गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चिनी हद्दीत येते. एवढेच नाही, तर 15 जूनच्या रात्री भारतीय सैनिकांनीच करार तोडून एलएसी ओलांडली आणि चिनी सैनिकांवर हल्ला केला.

चिनने गलवान खोऱ्यावर दावा करण्याच्या एक दिवस आधीच भारताने गलवान घाटीवरील चिनी सेन्याच्या सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावला होता. तसेच आपल्या हालचाली एलएसीच्या आतच ठेवा, असे सांगितले होते. गलवान खोऱ्यातील चीनचा दावा भारताने आधिच फेटाळून लावला आहे. भारताने म्हटले आहे, की अशा प्रकारचा खोटा दावा करणे, 6 जूनला झालेल्या उच्च स्तरीय सैन्य बैठकीत झालेल्या सहमतीविरोधात आहे.

India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी

चीन म्हणतोय गलवान खोरे आमचा भाग -माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते. अनेक वर्षांपासून तेथे चीनी सैनिक गस्त घालत आहेत.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

भारताने करार तोडला -चीनने दावा केला, की सोमवारी रात्री भारतीय सैनिक करार तोडून चीनच्या सीमेत घुसले आणि त्यांनी त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला केला. यानंतर तेथे हिंसक चकमक उडाली आणि सैन्याचे मोठे नुकसान झाले. भारतीय सेनिकांनी दोन्ही देशांतील कराराचे, तसेच आंतरराष्ट्रीय संबंध नियंत्रित करणाऱ्या मुलभूत मानदंडांचे उल्लंघन केले आहे.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

लवकरात लवकर बोलणी व्हावी -चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवरील एका प्रेस नोटमध्ये झाओ यांनी म्हटले आहे, या भागातील परिस्थितीवर मात करण्यासाठी लवकरात लवकर कमांडर स्तरावरील दुसरी बैठक व्हायला हवी. भारत आणि चिनी राजदूत तसेच सैन्य तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करत आहेत.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यामुळे सीमेवरील तणाव  अधिक वाढला आहे. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता. 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनladakhलडाखSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान