शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"दिसता क्षणी गोळ्या घाला"; बांगलादेशात हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 10:50 IST

बांगलादेशात हिंसक आंदोलनानंत आता देशव्यापी कर्फ्यू आणि "शूट-ऑन-साइट" आदेश लागू केले आहेत.

Bangladesh Violence Protests :बांगलादेशातआरक्षणाविरोधात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत शेकडो तरुणांचा मृत्यू झालाय. लष्कर तैनात करून आणि देशभर संचारबंदी लागू करूनही बांगलादेशात परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे आता सरकारने कठोर पाऊल उचललं आहे. हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता थेट दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

बांगलादेश गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धुमसत आहे. बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून हिंसाचार भडकला. देशाच्या विविध भागात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १३३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी देशभरात कडक संचारबंदी लागू केली आणि राष्ट्रीय राजधानी ढाक्याच्या विविध भागात लष्करी दलांनी तळ ठोकला आहे. दुसरीकडे, पोलिसांना पाहताच गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहून पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय लष्करालाही पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. नागरी सेवेतील नोकऱ्यांमधील कोटा रद्द करण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय रविवारी निकाल देणार आहे. गुरुवारी, आंदोलक विद्यार्थ्यांनी देशात संपूर्ण बंद लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा २२ जणांचा मृत्यू झाला होता.

आंदोलन कशासाठी?

बांगलादेशातील हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाची मागणी आणि विरोध हा आहे. १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या लोकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेले आरक्षण कायम ठेवावे, अशी आंदोलकांच्या एका गटाची मागणी आहे. तर दुसरी गट सरकारी नोकऱ्यांमध्ये हा प्रकार सुरू ठेवण्याच्या विरोधात आहे. हे आरक्षण रद्द झाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे बांगलादेशात सातत्याने हिंसाचार होत आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षण