शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

"दिसता क्षणी गोळ्या घाला"; बांगलादेशात हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 10:50 IST

बांगलादेशात हिंसक आंदोलनानंत आता देशव्यापी कर्फ्यू आणि "शूट-ऑन-साइट" आदेश लागू केले आहेत.

Bangladesh Violence Protests :बांगलादेशातआरक्षणाविरोधात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत शेकडो तरुणांचा मृत्यू झालाय. लष्कर तैनात करून आणि देशभर संचारबंदी लागू करूनही बांगलादेशात परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे आता सरकारने कठोर पाऊल उचललं आहे. हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता थेट दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

बांगलादेश गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धुमसत आहे. बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून हिंसाचार भडकला. देशाच्या विविध भागात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १३३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी देशभरात कडक संचारबंदी लागू केली आणि राष्ट्रीय राजधानी ढाक्याच्या विविध भागात लष्करी दलांनी तळ ठोकला आहे. दुसरीकडे, पोलिसांना पाहताच गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहून पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय लष्करालाही पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. नागरी सेवेतील नोकऱ्यांमधील कोटा रद्द करण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय रविवारी निकाल देणार आहे. गुरुवारी, आंदोलक विद्यार्थ्यांनी देशात संपूर्ण बंद लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा २२ जणांचा मृत्यू झाला होता.

आंदोलन कशासाठी?

बांगलादेशातील हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाची मागणी आणि विरोध हा आहे. १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या लोकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेले आरक्षण कायम ठेवावे, अशी आंदोलकांच्या एका गटाची मागणी आहे. तर दुसरी गट सरकारी नोकऱ्यांमध्ये हा प्रकार सुरू ठेवण्याच्या विरोधात आहे. हे आरक्षण रद्द झाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे बांगलादेशात सातत्याने हिंसाचार होत आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षण