शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले; म्हणाले, भारताची ताकद..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 09:52 IST

अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती.

नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केल्यानंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले होते. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. भारतासोबत चांगले घनिष्ट संबंध बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं विधान कॅनडाच्या पंतप्रधानांनी केले आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की, जून महिन्यात ब्रिटिश कोलंबिया इथं झालेल्या हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा हात होता या आरोपानंतरही कॅनडा आजही भारतासोबत घनिष्ट संबंध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. मॉन्ट्रियलच्या एका संमेलनात ते बोलत होते. कॅनडा आणि सहकारी देश जागतिक पातळीवर भारताचे वाढते महत्त्व पाहता त्यांच्यासोबत कायम संबंध ठेवण्यासाठी आम्ही गंभीर आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि शक्ती महत्त्वपूर्ण आहे. मागील वर्षी आम्ही इंडो पॅसिफिक रणनीतीचा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही भारतासोबत घनिष्ट संबंध ठेवण्यासाठी गंभीर आहोत. कॅनडासोबत मिळून काम करणे आवश्यक आहे हे भारतानेही निश्चित करायला हवे असं पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटलं. तर दुसरीकडे निज्जरच्या हत्येत भारताचा हात आहे असा आरोप करणाऱ्या ट्रुडो यांना अमेरिकेकडून झटका मिळाला आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती. परंतु या भेटीत अमेरिकेकडून निज्जर आणि कॅनडा यांचाही साधा उल्लेखही करण्यात आला नाही.

निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंध बिघडले

ब्रिटीश कोलंबियामध्ये १८ जूनला ४५ वर्षीय खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या गुप्तहेरांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर भारत-कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले. भारताने २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप भारत सरकारने फेटाळून लावले. हा आरोप चुकीचा आणि खोटा असल्याचे भारताने म्हटलं.

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा