शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले; म्हणाले, भारताची ताकद..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 09:52 IST

अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती.

नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केल्यानंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले होते. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. भारतासोबत चांगले घनिष्ट संबंध बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं विधान कॅनडाच्या पंतप्रधानांनी केले आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की, जून महिन्यात ब्रिटिश कोलंबिया इथं झालेल्या हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा हात होता या आरोपानंतरही कॅनडा आजही भारतासोबत घनिष्ट संबंध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. मॉन्ट्रियलच्या एका संमेलनात ते बोलत होते. कॅनडा आणि सहकारी देश जागतिक पातळीवर भारताचे वाढते महत्त्व पाहता त्यांच्यासोबत कायम संबंध ठेवण्यासाठी आम्ही गंभीर आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि शक्ती महत्त्वपूर्ण आहे. मागील वर्षी आम्ही इंडो पॅसिफिक रणनीतीचा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही भारतासोबत घनिष्ट संबंध ठेवण्यासाठी गंभीर आहोत. कॅनडासोबत मिळून काम करणे आवश्यक आहे हे भारतानेही निश्चित करायला हवे असं पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटलं. तर दुसरीकडे निज्जरच्या हत्येत भारताचा हात आहे असा आरोप करणाऱ्या ट्रुडो यांना अमेरिकेकडून झटका मिळाला आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भेटीवेळी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उचलवण्याची कॅनडाची अपेक्षा होती. परंतु या भेटीत अमेरिकेकडून निज्जर आणि कॅनडा यांचाही साधा उल्लेखही करण्यात आला नाही.

निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंध बिघडले

ब्रिटीश कोलंबियामध्ये १८ जूनला ४५ वर्षीय खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या गुप्तहेरांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर भारत-कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले. भारताने २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप भारत सरकारने फेटाळून लावले. हा आरोप चुकीचा आणि खोटा असल्याचे भारताने म्हटलं.

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा