शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

BRICS: चीनच्या पत्रकार महिलेने गायिले हिंदी गाणे,  'आजा रे...आजा रे ओ मेरे दिलबर आजा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 23:00 IST

चीनमध्ये आजपासून ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. बिक्र्स देशांचे अनेक पत्रकार सुद्धा परिषदेच्या वार्तांकनासाठी दाखल झाले. यावेळी एका चीनच्या रेडिओ पत्रकार महिलेने हिंदीमध्ये गाणे गायिले. 

शियामेन, दि. 4 - चीनमध्ये आजपासून ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. बिक्र्स देशांचे अनेक पत्रकार सुद्धा परिषदेच्या वार्तांकनासाठी चीनमध्ये दाखल झाले. यावेळी एका चीनच्या रेडिओ पत्रकार महिलेने हिंदीमध्ये गाणे गायिले. तांग युआंगई असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. भारतीय पत्रकारांसोबत तांग युआंगई ब्रिक्स परिषदेचे वार्तांकन करत होती. त्यावेळी उपस्थित भारतीय पत्रकारांनी तिला विचारले की, तुम्हाला हिंदी भाषा बोलता येते का, यावर ती म्हणाली, थोडी-थोडी येते. यावेळी पत्रकारांनी तिला हिंदी चित्रपटातील एखादे आवडीचे गाणे गाण्याची विनंती केली, त्यावर तिने 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नूरी' या चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय 'आजा रे...आजा रे ओ मेरे दिलबर आजा' हे  गाणे गायिले. वृत्तसंस्था एएनआयसोबत बातचीत करताना तांग युआंगई हिने सांगितले की,  भारताविषयी मला खूप प्रेम आहे. भारतातील एका विद्यापीठातून हिंदी भाषा अवगत केली आहे. तसेच, भारतातील अनेक लोकांसोबत मी प्रवास केला आहे. भारतीय लोकांना भेटल्यानंतर मला समजते की, भारतीय लोक जास्त इमानदार आणि चांगले असतात. यामुळेच मला भारताविषयी जास्त प्रेम वाटते.

दरम्यान, पाच दिवसांच्या ब्रिक्स परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये काल (दि.3) दाखल झाले आहेत.  ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच, नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे तज्ञ सांगत आहेत. 

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - - विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.-  आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. - भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे.  

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी