शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशला उपरती! नव्या क्रीडा मंत्र्यांनी शपथविधीवेळी घेतली भारतीय उपउच्चायुक्तांची भेट; म्हणाले, आम्ही वर्ल्डकप खेळू शकलो असतो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:15 IST

T20 World Cup 2026 Bangladesh news : टी-२० विश्वचषक २०२६ मधील नाट्यमय घडामोडींनंतर आता बांगलादेशने भारतासोबतचे क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. क्रीडा मंत्री अमिनुल हक यांनी मैत्रीचा हात पुढे केला.

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतात येण्यास नकार दिल्याने आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या बांगलादेशने आता भारतासोबतचे क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. बांगलादेशमध्ये सत्तेवर आलेल्या नव्या 'बीएनपी' सरकारचे क्रीडा मंत्री अमिनुल हक यांनी भारतासोबतचे मतभेद मैत्रीपूर्ण चर्चेद्वारे सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील क्रिकेट क्षेत्रात निर्माण झालेला तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

डिसेंबर २०२४ मध्ये मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून काढू टाकल्यानंतर या वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सुरक्षेचे कारण देत आपला संघ भारतात टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिला होता. आयसीसीने ही विनंती फेटाळून लावत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाला विश्वचषकात स्थान दिले होते. या निर्णयामुळे बांगलादेशला इतिहासात पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाला मुकावे लागले.

नव्या क्रीडा मंत्र्यांचा पुढाकारअमिनुल हक यांनी पदभार स्वीकारताच भारताच्या उपउच्चायुक्तांशी चर्चा केली. ते म्हणाले, "आम्हाला भारतासोबतचे संबंध पुन्हा प्रस्थापित करायचे आहेत. जुन्या बीसीबी प्रशासनाचे निर्णय संशयास्पद होते आणि त्यामुळेच क्रिकेटचे नुकसान झाले. हे प्रकरण नीट हाताळले गेले असते तर आम्ही वर्ल्डकप खेळू शकलो असतो."

शाकिब आणि मुर्तझा यांचे पुनरागमन होणार?क्रीडा मंत्र्यांनी केवळ भारतासोबतच्या संबंधांवरच भाष्य केले नाही, तर अवामी लीगच्या काळातील खेळाडू शाकिब अल हसन आणि मश्रफी मुर्तझा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सूतोवाच केले. हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा बांगलादेशच्या जर्सीत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh seeks improved cricket ties with India after World Cup miss.

Web Summary : Bangladesh's new sports minister aims to mend cricket relations with India after missing the T20 World Cup. Disputes over player selection and security concerns strained ties. The minister also hinted at the return of Shakib Al Hasan and Mashrafe Mortaza.
टॅग्स :BangladeshबांगलादेशT20 Cricketटी-20 क्रिकेटT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६Pakistanपाकिस्तानIndia vs Bangladeshभारत विरुद्ध बांगलादेश