शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:53 IST

आरोग्य विभागाच्या मते, अवघ्या २४ तासांत १,१०१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७३,९२३ झाली आहे.

बांगलादेशमध्येडेंग्यू व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोग्य विभागाने (DGHS) आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, ज्यामुळे मृतांची एकूण संख्या २९२ झाली. राजधानी ढाकामध्ये परिस्थिती सर्वात गंभीर आहे, जिथे रुग्णालये लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहेत आणि अनेक भागात बेडची मोठी कमतरता आहे. आरोग्य विभागाच्या मते, अवघ्या २४ तासांत १,१०१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७३,९२३ झाली आहे.

ढाकाच्या दोन्ही शहर महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. DGHS च्या ताज्या आकडेवारीनुसार, ढाकाच्या उत्तर भागात २४१, दक्षिणेत १७५ आणि बरीशाल, चट्टोग्राम, खुलना आणि राजशाही सारख्या इतर विभागांमध्ये शेकडो रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही संसर्ग पसरू लागला आहे, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर आणखी ताण आला आहे.

सातत्याने वाढतोय डेंग्यूचा धोका

गेल्या तीन वर्षातील आकडेवारीवरून असं दिसून येतं की, बांगलादेशात डेंग्यूचा धोका सातत्याने वाढत आहे. २०२३ मध्ये, या आजाराने १,७०५ जणांचा जीव घेतला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. २०२४ मध्ये मृत्यू ५७५ पर्यंत कमी झाले, परंतु २०२५ मध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ही फक्त नोव्हेंबरची सुरुवात आहे आणि मृतांची संख्या आधीच २९२ वर पोहोचली आहे.

भारताच्या पूर्वेकडील राज्यांसाठी धोक्याची घंटा

आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की बांगलादेशमध्ये डेंग्यूच्या वेगाने वाढणाऱ्या घटनांचा पूर्व भारतावर परिणाम होऊ शकतो. पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि झारखंड सारखी राज्ये संसर्गाला बळी पडू शकतात, कारण भारत-बांगलादेश सीमा आहे आणि लोक सतत येत असतात. पाऊस आणि आर्द्रतेमुळे या राज्यांमध्ये डासांची पैदास होण्याची शक्यता देखील वाढते.

बांगलादेश सरकारच्या कडक उपाययोजना

डेंग्यूमुळे परिस्थिती बिकट होत असताना, डीजीएचएसने सर्व सरकारी रुग्णालयांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र डेंग्यू वॉर्ड तयार करणं बंधनकारक आहे आणि विशेष वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत. सरकारने प्रत्येक जिल्ह्यात डास प्रतिबंधक फवारणी, अळ्या नियंत्रण आणि स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. डासांची संख्या कमी करण्यासाठी ढाकामध्ये सतत फॉगिंग आणि स्वच्छता केली जात आहे, परंतु सततचा पाऊस आणि पाणी साचल्याने डासांची पैदास रोखली जात नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Dengue Outbreak in Bangladesh: India on Alert After 292 Deaths

Web Summary : Bangladesh faces a severe dengue outbreak with 292 deaths reported. Hospitals are overwhelmed, especially in Dhaka. Experts warn of potential spread to eastern Indian states due to border proximity and favorable breeding conditions. Measures like dedicated dengue wards and mosquito control are underway.
टॅग्स :Bangladeshबांगलादेशdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सIndiaभारत