शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

ऑस्ट्रेलिया आग : आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आता पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 09:38 IST

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.  

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुराचा धोका.न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरीया आणि क्विंसलँडमध्ये पावसाने कहर केला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सिडनी - ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्यूमुखी पडले. आगीने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. याशिवाय साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींनी देवाचा धावा केला. नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील स्थिती आटोक्यात यावी म्हणून प्रार्थना केली. या सर्वांची प्रार्थना त्याने ऐकली अन् ऑस्ट्रेलियात वरुण राजाचं आगमन झालं. पावसाच्या आगमनाने तेथील प्राणी, पक्षी अन् जगभरातील मनुष्य सुखावला गेला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या काही भागात लागलेले वणवे विझले आहेत. तर काही भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरीया आणि क्विंसलँडमध्ये पावसाने कहर केला आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये वादळीवाऱ्यसह जोरदार पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिला आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 75 ठिकाणी आग लागलेली आहे. पाऊस आणि थंडीमुळे तापमानात झालेली घट याचा वापर हा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जात आहे. 

आग लागलेल्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. क्विंसलँडमध्ये सर्वाधिक पाऊस पडला असून तेथील नगरिकांना त्याचा फटका बसला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पूर आला आहे. मात्र आतापर्यंत पावसामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्नितांडवात होरपळलेल्या जीवांच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे येत आहेत. क्रिकेटपटूंनीही आपापल्या परीने पीडितांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ऑस्ट्रेलियातील या आगीची तीव्रता पाहून जगभरातील लोकांनी प्राणी-पक्षी अन् माणसांसाठी प्रार्थना केली होती. ऑस्ट्रेलियात पावसाचं आगमन झालं. या पावसाच्या आगमनाने तेथील मनुष्य, प्राणी अन् पक्षांनी अत्यानंद साजरा केला. या पावसाच्या स्वागतात चक्क कांगारूंनी नाचून पावसाच्या सरी आपल्या अंगावर घेतल्या. तर, मदत व बचावकार्य करणाऱ्या तेथील जवानाने दोन्ही हात आभाळाच्या दिशेने उंचावत निसर्गाचे धन्यवाद मानले होते. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे प्राण गेले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या  

लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार

CAA लागू करण्यासाठी कोणतंही राज्य नकार देऊ शकत नाही- कपिल सिब्बल

कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारीसुद्धा पीएफ योजनेस पात्र- सर्वोच्च न्यायालय

साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डी आजपासून बंद

 

टॅग्स :Australia fireऑस्ट्रेलिया भीषण आगfloodपूरfireआगRainपाऊसAustraliaआॅस्ट्रेलिया