शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतोय का? गेल्या तीन दशकांच्या संशोधनातील निष्कर्ष आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:19 IST

Health News: मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे गेल्या तीन दशकांत झालेल्या संशोधनातून आढळले आहे. रेडिओलहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल हा अभ्यास करण्यात आला होता.

मेलबर्न - मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे गेल्या तीन दशकांत झालेल्या संशोधनातून आढळले आहे. रेडिओलहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल हा अभ्यास करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने याकामी पुढाकार घेतला होता. या संशोधनाबाबतचा लेख जर्नल एन्व्हाॅयरमेन्टल इंटरनॅशनलच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. 

मोबाइल फोनमधील रेडिओलहरींमुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते, असा एक समज आहे. तोच केंद्रस्थानी ठेवून हे संशोधन करण्यात आले होते. त्यातून असे लक्षात आले की, मोबाइलमधील रेडिओलहरींचा मेंदूचा कर्करोग होण्याशी काहीही संबंध नाही. मात्र काही शास्त्रज्ञांनी मेंदूचा कर्करोग होण्याच्या कारणांमध्ये मोबाइल फोनच्या रेडिओलहरींचाही समावेश केला होता. २०११ साली इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने एका अभ्यासाअंती असाच निष्कर्ष काढला होता. (वृत्तसंस्था)

मत बदलले...२०११ नंतर हा समज आणखी वाढला होता.  त्यामुळे त्यावेळी त्यांच्या निष्कर्षांना कोणी विरोधही केला नव्हता. मात्र दीर्घकालीन अभ्यासानंतर बहुतांश शास्त्रज्ञांचे या विषयाबाबतचे मत बदलले आहे. 

‘मेंदूच्या कर्करोगाच्या रुग्णांत मोठी वाढ नाही’- मोबाइलच्या रेडिओलहरी व मेंदूचा कर्करोग या विषयावर आजवर अनेक वेळा अभ्यास करण्यात आला. 

१९९४ ते २०२२या कालावधीत ६३ अभ्यासांचे निष्कर्ष नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यात आले होते. 

- गेल्या तीन दशकांतील संशोधनातून असे लक्षात आले की, वायरलेस तंत्रज्ञानाचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी मेंदूचा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या संख्येत खूप वाढ झालेली नाही.

टॅग्स :Mobileमोबाइलcancerकर्करोगHealthआरोग्य