शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखंड भारतावर पुतिन यांचे गुरू अलेक्झांडर दुगिन यांचा लेख; मोदी सरकार, भाजप, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 22:17 IST

दुगिन यांच्या मते, भारत आपल्या डोळ्यांसमोरच एक नवे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला आहे.

रशियाचे राजकीय तत्त्वज्ञ अलेक्झांडर दुगिन यांनी अखंड भारतासंदर्भात आपले विचार मांडले आहेत. त्यांनी आपल्या या लेखात भारताच्या उदयासंदर्भात रशिया काय विचार करतो हे प्रकट केले आहे. दुगिन यांच्या मते, भारत आपल्या डोळ्यांसमोरच एक नवे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला आहे. 

याशिवाय, आज भारतीय वंशाचे लोक संपूर्ण जगात मोठी भूमिका पार पाडत आहेत, असेही दुगिन  यांनी लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे, पश्चिमेकडील देशांमध्ये अलेक्झांडर दुगिन यांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे गुरू मानले जाते. अलेक्झांडर दुगिन यांचे पूर्ण नाव अलेक्सांद्र गेलीविच दुगिन असे आहे. दुगिन फॅसिस्ट विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत, असा आरोपही पश्चिमेकडील देशांकडून केला जातो.

दुगिन यांच्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे -आर्थिक विकास - 2023 मधील 8.4% GDP वाढीचा विचार करता भारत सध्या जागतिक पातळीवर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे.

जागतिक प्रभाव - भारतीय वंशाचे लोक जगभरात लक्षणीय प्रभाव पाडत आहेत. सिलिकॉन व्हॅलीसह अनेक प्रमुख क्षेत्रांचे नियंत्रण त्यांच्याकडे आहे. ऋषी सुनक आणि विवेक रामास्वामी सारख्या व्यक्ती ब्रिटन आणि अमेरिकेच्या राजकारणात मुख्य भूमिका बजावत आहेत.

राजकीय बदल - भारतीय जनता पक्षाने 1996 मध्ये सत्तेवर येत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दीर्घकाळाचे वर्चस्व संपवले. आपल्या लेखात त्यांनी भाजपला उजव्या विचारसरणीचा पक्ष तर काँग्रेसला डाव्या विचारसरणीकडे झुकलेला पक्ष म्हटले आहे. एवढेच नाही, तर "हे डाव्या विचारसरणीकडून उजव्या परंपरावादी शासन व्यवस्थेत होत असलेला बदल दर्शवते," असेही त्यांनी म्हटले आहे.

सांस्कृतिक आणि वैचारिक बदल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, INDIA हे नाव बदलून संस्कृतमध्ये "भारत" करण्यात आले आहे. जे पुराणमतवादी आणि पारंपारिक विचारसरणीकडे जाण्याचे संकेत देते.

बाहेरील विरोध - अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस सारख्या व्यक्तींनी मोदींच्या धोरणांना विरोध केला आहे. यामुळे भारतामध्ये सामाजिक आणि जातीय तणाव वाढला आहे.

रशियन दृष्टीकोन: रशिया भारतातील बदल ओळखतो आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेला चालना देण्यासाठी, भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत संतुलित संबंध राखण्याचे समर्थन करतो.

टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाEconomyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा