शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 14:17 IST

American Economist Jeffrey Sachs: अमेरिकेच्या सापळ्यात भारताने अडकू नये. जागतिक व्यवस्थेत भारताने आपली स्वतंत्र आणि प्रभावी भूमिका बजावली पाहिजे, असेही या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

American Economist Jeffrey Sachs: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये कमालीची कटुता आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ आकारला आहे. यासंदर्भात भारताकडे २१ दिवसांची मुदत आहे. यातच अमेरिकेतील एका अर्थशास्त्रज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली असून, भारताला एक महाशक्ती संबोधले आहे. 

अमेरिकन नेत्यांकडून जास्त अपेक्षा करू नका. अमेरिकेतील राजकारण्यांना भारताबाबत किंचितही कणव नाही. क्वाडमध्ये अमेरिकेसोबत सामील होऊन भारताला चीनविरुद्ध दीर्घकालीन सुरक्षा फायदा मिळणार नाही. भारत ही एक महाशक्ती आहे, ज्याची स्वतःची स्वतंत्र जागतिक ओळख आहे. अमेरिकन राजकारणात भारताच्या हिताला प्राधान्य नाही. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले ५० टक्के टॅरिफ हे केवळ चुकीचे, अन्यायकारक असून, असंवैधानिक आहेत. यातून हेच स्पष्ट संकेत जात आहेत की, वॉशिंग्टनशी संबंध कायमस्वरूपी विश्वासाच्या पायावर आधारित नाहीत, या शब्दांत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर तोंडसुख घेतले.

अमेरिकेच्या सापळ्यात भारताने अडकू नये

अमेरिका स्वतःला मित्र म्हणवून लोकांना फसवत आहे. भारताने या सापळ्यात अडकू नये. काही महिन्यांपूर्वीच्या भारत भेटीदरम्यान भारताला अमेरिकेसोबतच्या कोणत्याही व्यापक व्यापार संबंधांवर अवलंबून राहू नये, असा इशारा दिला होता याची आठवण त्यांनी करून दिली. भारत आणि चीनमधील सीमारेषेवरून तणाव असूनही, दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक संबंध भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. चीनची व्यापारी व्याप्ती आणि आर्थिक शक्ती अमेरिकेपेक्षा खूप मोठी आहे. जागतिक व्यवस्थेत भारताने आपली स्वतंत्र आणि प्रभावशाली भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा जेफ्री यांनी व्यक्त केली. ते मीडियाशी बोलत होते.

दरम्यान, जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेने भारताविरुद्ध ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे आता दोन्ही देशांतील व्यापार वाटाघाटी गतिमान होतील का, या प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, अजिबात नाही. जोपर्यंत हा मुद्दा (टॅरिफ) सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही वाटाघाटी होणार नाहीत. ट्रम्प यांनी आधी २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. ७ ऑगस्टपासून ते लागूही झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी अजून २५ टक्के टॅरिफ लावले. त्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्के झाले आहे. 

 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पbusinessव्यवसाय