शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 23:35 IST

चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले.

ठळक मुद्देचीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने 1962च्या युद्धाच्या फुशारक्या मारत धमकी देत आहे.भारताने गोळी चालवली, तर परिणाम भोगावे लागतील.जर भारताने एकतर्फी सीमा व्यवस्थापन तंत्राचे उल्लंघण केले, तर चीनलाही चोख उत्तर द्यावे लागेल.

पेइचिंग : लडाखमध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीपासून दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत सरकारने सीमेवर तैनात असलेल्या सैन्य अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार दोन्ही देशांतील करारात बदल करण्याची पूर्ण सूट दिली आहे. याचा अर्थ, परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी गोळी चालवणे आवश्यकच आहे, असे अधिकाऱ्यांना वाटले, तर ते क्षणाचाही विलंब न करता जवानांना तसा आदेश देऊ शकतात. मोदी सरकारच्या या निर्णयामुळेच चीनला मिर्ची झोंबली आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

चीन मारतो 1962च्या युद्धाच्या फुशारक्या - चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले. जर भारताने एकतर्फी सीमा व्यवस्थापन तंत्राचे उल्लंघण केले, तर चीनलाही चोख उत्तर द्यावे लागेल. मग, कुणाची मदतही भारताच्या कामी येणार नाही.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

भारताने गोळी चालवली, तर परिणाम भोगावे लागतील - चीनी माध्यमाने खुली धमकी देत लिहिले आहे, चिनी सैनिकंसोबत कराराचे नियम बदलने आणि गोळी चलवण्याची परवानगी दिल्याने भारताच्याच सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. भारतीय लष्कराने गोळीबार केलाच, तर चिनी सैनिकही याचे उत्तर देतील. भारताने सीमेवर शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, तर चीनही यात सहभागी होईल. मग भलेही चीन रणनीतीकदृष्ट्या घेरला गेलेला असेल, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

1996मध्ये दोन्ही देशांत करार -भारत आणि चीन यांच्यात 1996 मध्ये करार झाला आहे, की एलएसीच्या दोन किलोमिटर परिसरात दोन्ही देश गोळी चालवणार नाहीत अथवा स्फोटकांसह गस्तही घालणार नाहीत. तसेच गस्त घालतानाही दोन्ही देशांच्या सैनिकांकडे असलेल्या बंदुकांचे बॅरल जमिनीच्या दिशेने असेल. 

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान