'अजमल कसाबला इतक्या लवकर फाशी द्यायला नको होती...', तहव्वूरच्या प्रत्यार्पणावर माजी पाकिस्तान उच्चायुक्त काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:51 IST2025-04-10T18:49:31+5:302025-04-10T18:51:22+5:30

माजी पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारतावर आरोप केले आहेत.

Ajmal Kasab should not have been hanged so soon what did the former Pakistan High Commissioner say on Tahawwur's extradition? | 'अजमल कसाबला इतक्या लवकर फाशी द्यायला नको होती...', तहव्वूरच्या प्रत्यार्पणावर माजी पाकिस्तान उच्चायुक्त काय म्हणाले?

'अजमल कसाबला इतक्या लवकर फाशी द्यायला नको होती...', तहव्वूरच्या प्रत्यार्पणावर माजी पाकिस्तान उच्चायुक्त काय म्हणाले?

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी भारतात आणले. भारतात पोहोचल्यानंतर त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. तहव्वूरच्या प्रत्यार्पणाबाबत, माजी पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अजमल कसाबच्या फाशीचा मुद्दा उपस्थित केला.२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला गुरुवारी (१० एप्रिल २०२५) भारतात आणले जाईल. येथे पोहोचल्यानंतर त्याच्यावर खटला चालवला जाईल. तहव्वुरच्या प्रत्यार्पणाबाबत, माजी पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अजमल कसाबच्या फाशीचा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले, भारत मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्याला पाठिंबा देत नाही. त्यांनी सांगितले की पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्यासाठी अजमल कसाब जिवंत राहणे आवश्यक होते, परंतु भारताने पाकिस्तानला त्याची उलटतपासणी करण्याची परवानगी दिली नाही. ते म्हणाले की, भारत मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्याला पाठिंबा देत नाही. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्यासाठी अजमल कसाब जिवंत राहणे आवश्यक होता, पण भारताने पाकिस्तानला त्याची उलटतपासणी करण्याची परवानगी दिली नाही, असंही ते म्हणाले. 

'UPA सरकारच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीचे परिणाम', तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर पी चिदंबरम यांनी स्पष्टच सांगितले

अब्दुल बासित म्हणाले की, तहव्वूर राणामुळे भारताला एक मोठा चर्चेचा विषय मिळेल. त्याचा उल्लेख कमी होईल, पण मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था होती आणि तिला लष्कर-ए-तोयबाचा पूर्ण पाठिंबा होता हे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. जेव्हा मुंबई हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानने भारताला पूर्ण सहकार्य केले, ही वेगळी बाब आहे की भारताने २१ नोव्हेंबर २०१२ रोजी अजमल कसाबला फार घाईघाईने फाशी दिली जेणेकरून कोणतेही पुरावे शिल्लक राहिले नाहीत, असंही अब्दुल बासित म्हणाले. 

'पाकिस्तानला अजमलची उलटतपासणी करण्याची परवानगी नव्हती'

अब्दुल बासित म्हणाले की, अजमल कसाबचे पाकिस्तानशी संबंध असल्याबद्दल शंका आहे. अनेक लोक म्हणतात की अजमल कसाबचा पाकिस्तानशी काहीही संबंध नव्हता. पाकिस्तानचा एक न्यायिक आयोगही भारतात गेला होता, परंतु त्यांना अजमल कसाबला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही , त्याची उलट तपासणी करु दिली नाही. 

Web Title: Ajmal Kasab should not have been hanged so soon what did the former Pakistan High Commissioner say on Tahawwur's extradition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.