शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दहशतवादानंतर आता राजकारणातही हाफिज सईदचा प्रवेश, नव्या पक्षाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 9:11 AM

2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे

ठळक मुद्दे हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला 'मिल्ली मुस्लिम लीग' असं नाव देण्यात आलं आहे'जमात-उद-दावा'चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड हाफिज सईदची पक्षामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही

इस्लामाबाद, दि. 8 - 2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे. हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला 'मिल्ली मुस्लिम लीग' असं नाव देण्यात आलं आहे. 'जमात-उद-दावा'चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचं नाव, लोगो आणि झेंडा जाहीर करण्यात आलं. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सैफुल्लाह याने सांगितलं की, 'पाकिस्तानला एक इस्लामिक देश बनवण्याचा मिल्ली मुस्लिम लीग प्रयत्न केलं. तसंच त्याच्या कल्याणासाठी काम करेल'. समान विचारसरणी असणा-या पक्षांसोबत काम करण्यास आपण तयार असल्याचंही सैफुल्लाह बोलला आहे. मात्र  'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदची पक्षामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

पाकिस्तानात सध्या राजकीय भूकंप आला असून नेमकी हीच संधी साधत हाफिज सईदने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पनामागेट प्रकरणी नवाज शरिफ यांना आपलं पंतप्रधानपद सोडावं लागलं. अशा परिस्थितीत आपल्यासाठी राजकारणात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं हाफिज सईदला वाटत आहे. पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयमध्ये असलेल्या आपल्या ओळखींचा फायदा घेत हाफिज सईद राजकारणातील प्रवेशात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे. 

विशेष म्हणजे हाफिज सईद गेल्या सहा महिन्यांपासून नजरकैदेत आहेत. पंजाब सरकारने 31 जानेवारी रोजी हाफिज सईद आणि त्याचे जवळचे चार साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काजी आसिफ हुसैन यांना दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ताब्यात घेतलं होतं.  'जमात-उद-दावा' विरोधात कोणतीच कारवाई केली नाही तर पाकिस्तानवर बंदी येऊ शकते अशी धमकीच अमेरिकेने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात अजून दोन महिन्यांसाठी कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

हाफिज सईद मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. भारताने नेहमीच त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.