शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

दहशतवादानंतर आता राजकारणातही हाफिज सईदचा प्रवेश, नव्या पक्षाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 09:13 IST

2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे

ठळक मुद्दे हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला 'मिल्ली मुस्लिम लीग' असं नाव देण्यात आलं आहे'जमात-उद-दावा'चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड हाफिज सईदची पक्षामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही

इस्लामाबाद, दि. 8 - 2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे. हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला 'मिल्ली मुस्लिम लीग' असं नाव देण्यात आलं आहे. 'जमात-उद-दावा'चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचं नाव, लोगो आणि झेंडा जाहीर करण्यात आलं. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सैफुल्लाह याने सांगितलं की, 'पाकिस्तानला एक इस्लामिक देश बनवण्याचा मिल्ली मुस्लिम लीग प्रयत्न केलं. तसंच त्याच्या कल्याणासाठी काम करेल'. समान विचारसरणी असणा-या पक्षांसोबत काम करण्यास आपण तयार असल्याचंही सैफुल्लाह बोलला आहे. मात्र  'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदची पक्षामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

पाकिस्तानात सध्या राजकीय भूकंप आला असून नेमकी हीच संधी साधत हाफिज सईदने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पनामागेट प्रकरणी नवाज शरिफ यांना आपलं पंतप्रधानपद सोडावं लागलं. अशा परिस्थितीत आपल्यासाठी राजकारणात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं हाफिज सईदला वाटत आहे. पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयमध्ये असलेल्या आपल्या ओळखींचा फायदा घेत हाफिज सईद राजकारणातील प्रवेशात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे. 

विशेष म्हणजे हाफिज सईद गेल्या सहा महिन्यांपासून नजरकैदेत आहेत. पंजाब सरकारने 31 जानेवारी रोजी हाफिज सईद आणि त्याचे जवळचे चार साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काजी आसिफ हुसैन यांना दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ताब्यात घेतलं होतं.  'जमात-उद-दावा' विरोधात कोणतीच कारवाई केली नाही तर पाकिस्तानवर बंदी येऊ शकते अशी धमकीच अमेरिकेने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात अजून दोन महिन्यांसाठी कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

हाफिज सईद मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. भारताने नेहमीच त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.