शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

११ दिवसांनंतर कोरोना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:48 AM

सिंगापूरमध्ये ३१ हजारांहून अधिक रुग्ण असून,१३ हजारांहून अधिक म्हणजे ४५ टक्के लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

सिंगापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अकरा दिवसांनी संबंधित रुग्णांपासून कोणालाही लागण होण्याचा धोका उरत नाही, असे येथे नव्याने केलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे.

सिंगापूरमधील नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शिअस डिसिजेस व अकॅडमी आॅफ मेडिसिन्स या दोन संस्थांतील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या ७३ रुग्णांच्या केलेल्या संयुक्त पाहणीतून हा निष्कर्ष काढला आहे. एखाद्याला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर अकरा दिवसांनी त्या व्यक्तीपासून अन्य कोणालाही संसर्ग होण्याचा धोका शिल्लक राहत नाही. या निष्कर्षामुळे कोरोनाग्रस्तांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी कधी देण्यात यावी याबद्दलच्या धोरणात बदल होण्याची शक्यता आहे. ताज्या पाहणी अहवालानुसार कोरोना रुग्णांच्या उपचार पद्घतीतही काही बदल करता येतील का, याची चाचपणी सिंगापूर सरकारने सुरू केली आहे.

सिंगापूरमध्ये ३१ हजारांहून अधिक रुग्ण असून,१३ हजारांहून अधिक म्हणजे ४५ टक्के लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. या देशात शनिवारी ६४२ नवे रुग्ण आढळून आले. सिंगापूरमध्ये इतर देशांतून नोकरी-व्यवसायासाठी आलेल्यांची संख्याही काही लाखांत आहे. यांच्या वस्त्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भारतातूनही काही लाख लोक सिंगापूरमध्ये रोजीरोटीसाठी गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीची त्यांच्या कुटुंबीयांना चिंता लागली आहे.

शाळा सुरू होणार २ जूनपासून

सिंगापूरमधील शाळा २ जूनपासून सुरू होणार आहेत. त्याआधी शाळांतील कर्मचारी वर्गाचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. त्यामध्ये एका शाळेतील २ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

टॅग्स :singaporeसिंगापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या