शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:14 IST

काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं.

काबुल: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानवरतालिबानी संकट कोसळलेलं असताना राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. मात्र मी तालिबान्यांना घाबरून देश सोडणार नाही, अशी ठाम भूमिका अमरुल्लाह सालेह यांनी घेतली आहे. 

काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं. अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदीदेखील अमरुल्लाह यांच्याबरोबर असल्याचीही शक्यता आहे.

पंजशीरमधील सुत्रांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूद यांनी पूर्व उत्तर आघाडीचे प्रमुख कमांडर आणि सहकाऱ्यांशी पुन्हा संपर्क केला असून त्या सर्वांनाही संघर्षात सहभागी होण्यासाठी तयार केलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात मोठी घौडदौड पाहायला मिळत आहे. काबुलपासून जवळपास तीन तासांच्या अंतरावर असलेला पंजशीर प्रांत हा तालिबानविरोधी संघर्षासाठी ओळखला जातो. 1996 पासून 2001 पर्यंत तालिबानच्या शासन काळादरम्यानही हा प्रांत त्यांच्या ताब्यात नव्हता. त्याठिकाणी नॉर्दर्न अलायन्सनं तालिबानशी दोन हात केले होते.

दरम्यान, तालिबाननं काबुलवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी साहेल यांनी युद्धग्रस्त प्रांताचा काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून स्वत:च्या नावाची घोषणा केली. "मी आता देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती असून हा निर्णय मी कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेला आहे. तत्कालीन राष्ट्रपतीच्या अनुपस्सथितीत उपराष्ट्रपती म्हणून देशाला सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे", असं सालेह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सालेह यांनी तालिबान्यांना अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचं जाहीर केलं आणि पाकिस्तानवरही हल्लाबोल केला आहे. 

तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत-

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. काबुलच्या विमानतळावरील गर्दी कायम आहे. दिवसागणिक गर्दी वाढत आहे. 

तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली-

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व माल वाहतुकीवर बंदी घातली आहे. डॉ. सहाय म्हणाले की, भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि कांदा यासारख्या वस्तू आयात केल्या जातात. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान