शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:14 IST

काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं.

काबुल: अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानला रोखठोक आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानवरतालिबानी संकट कोसळलेलं असताना राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. मात्र मी तालिबान्यांना घाबरून देश सोडणार नाही, अशी ठाम भूमिका अमरुल्लाह सालेह यांनी घेतली आहे. 

काबुलमध्ये तालिबान आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर, अमरुल्लाह पंजशीरला गेले आणि अजूनही ते तिथं आहेत, असं त्यांनी सांगितलं. अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदीदेखील अमरुल्लाह यांच्याबरोबर असल्याचीही शक्यता आहे.

पंजशीरमधील सुत्रांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, अमरुल्लाह सालेह आणि अहमद मसूद यांनी पूर्व उत्तर आघाडीचे प्रमुख कमांडर आणि सहकाऱ्यांशी पुन्हा संपर्क केला असून त्या सर्वांनाही संघर्षात सहभागी होण्यासाठी तयार केलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात मोठी घौडदौड पाहायला मिळत आहे. काबुलपासून जवळपास तीन तासांच्या अंतरावर असलेला पंजशीर प्रांत हा तालिबानविरोधी संघर्षासाठी ओळखला जातो. 1996 पासून 2001 पर्यंत तालिबानच्या शासन काळादरम्यानही हा प्रांत त्यांच्या ताब्यात नव्हता. त्याठिकाणी नॉर्दर्न अलायन्सनं तालिबानशी दोन हात केले होते.

दरम्यान, तालिबाननं काबुलवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी साहेल यांनी युद्धग्रस्त प्रांताचा काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून स्वत:च्या नावाची घोषणा केली. "मी आता देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती असून हा निर्णय मी कायद्याच्या चौकटीत राहून घेतलेला आहे. तत्कालीन राष्ट्रपतीच्या अनुपस्सथितीत उपराष्ट्रपती म्हणून देशाला सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे", असं सालेह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सालेह यांनी तालिबान्यांना अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचं जाहीर केलं आणि पाकिस्तानवरही हल्लाबोल केला आहे. 

तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत-

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. काबुलच्या विमानतळावरील गर्दी कायम आहे. दिवसागणिक गर्दी वाढत आहे. 

तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली-

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व माल वाहतुकीवर बंदी घातली आहे. डॉ. सहाय म्हणाले की, भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि कांदा यासारख्या वस्तू आयात केल्या जातात. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान