शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

Afghanistan Taliban Crisis: काबुल एअरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा कब्जा; हल्ला केल्यास याद राखा, तालिबानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 16:23 IST

काबुल एअरपोर्टवरील जे फोटो समोर येत आहेत. ते खूप भयावह आहेत. हे फोटो पाहिले तर काबुल एअरपोर्टवर काय चित्र आहे ते स्पष्ट होईल.

 नवी दिल्ली – अफगाणिस्तानात सध्या तालिबानी सत्ता आहे. देश तालिबानच्या हाती गेल्यानं अफगाणी लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारी अनेक लोक आहेत. दोन दशकाच्या युद्धानंतर अमेरिकेने त्यांचे सैनिक पूर्णपणे परत बोलावलं आहे. अमेरिकेच्या या पाऊलानंतर दोन आठवड्यातच तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. १९९० पर्यंत अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा होता. त्यानंतर आता पुन्हा अफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेला आहे.

काबुल एअरपोर्टवरील जे फोटो समोर येत आहेत. ते खूप भयावह आहेत. हे फोटो पाहिले तर काबुल एअरपोर्टवर काय चित्र आहे ते स्पष्ट होईल. या फोटोतून अमेरिकन सैन्य हटले तर..भारतासह अन्य देशातील नागरिकांना याठिकाणाहून रेस्क्यू करणं कठीण होईल.

काबुल एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सैन्याचे १ हजार अतिरिक्त जवान तैनात आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर काबुल एअरपोर्टवर अराजकता माजली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेच्या सैन्यांनी दोन सशस्त्र लोकांना मारलं.

तालिबानी सत्ता आल्यानंतर लोकांमध्ये इतकी दहशत आहे की, कुठल्याही स्थितीत देश सोडण्यासाठी लोकांनी काबुल एअरपोर्टवर गर्दी केली आहे. एअरपोर्टवर हजारोंच्या संख्येने गर्दी झाली आहे. विमानात चढण्यासाठी लोकांची चढाओढ लागली आहे. या गोंधळात अमेरिकन सैन्याने इशारा म्हणून गोळीबारी केली. त्यात ५ लोकांचा जीव गेल्याची बातमी आहे.

अमेरिकेने तालिबानला इशारा दिलाय की, जर त्यांनी अमेरिकन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, अफगाणिस्तानातील त्यांच्या कॅम्पना बाधित केले तर अमेरिका त्याविरोधात कठोर आणि आक्रमक कारवाई करेल. अमेरिकन सैन्याचे उच्च अधिकारी म्हणाले की, आम्ही तालिबानी नेत्यांशी समोरासमोर चर्चा केली आहे. एअरपोर्टहून लोकांना बाहेर जाण्याच्या कामात अडथळा आणू नका असा आग्रह धरला आहे.

दोन दशक सुरू असलेल्या युद्धानंतर अमेरिकेने त्यांचे सैनिक पूर्णपणे परत बोलावले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयानंतर दोन आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. १९९६ ते २००१ दरम्यान तालिबानद्वारे लोकांवर करण्यात आलेले अत्याचार आणि त्या कटू आठवणीच्या जखमा आजही लोकांच्या मनात कायम आहेत. तालिबानाच्या हिंसक कृत्यामुळे महिला चिंतेत आहेत. तालिबानी काळात महिलांना घरातच राहण्यास त्या मजबूर होत्या.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारतAmericaअमेरिका