शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 05:56 IST

Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते.

नवी दिल्ली : तालिबानने ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे काबूलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास भारताने सुरुवात केली आहे. भारतीय वायुसेनेची दोन विमाने २०० भारतीयांना घेऊन मायदेशी परत आली. ही विमाने गुजरातच्या जामनगर येथे दाखल झाली. त्यात भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. काबूलचे विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियाने काबूलहून विशेष उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू असताना तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने अडचण निर्माण झाली होती.

तोवर सेवा सुरूच राहणारभारताने अफगाणिस्तानातून राजदूतांसह दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी १९९६ नंतर पुन्हा एकदा तेथील दूतावास बंद झाला आहे. मात्र, अद्यापही काही भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी एअर इंड‍ियाने विशेष विमाने उडविण्याचा निर्णय घेतला आहे. काबूल येथील विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियातर्फे विशेष विमाने उडविणार असल्याची माहिती रुद्रेंद्र टंडन यांनी दिली.

पासपोर्टअभावी अनेक कामगार अडकलेउत्तर प्रदेशातील काही कामगार काबूलमधील एका कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. त्यांचे पासपोर्ट कंपनीच्या मालकाने ताब्यात घेतल्याचे या कामगारांनी सांगितले असून, आपल्याला लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची विनंती या कामगारांनी केली. 

भारतीयांना असे काढले बाहेरकाबूलचे विमानतळ अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे. त्यांनी विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर विमान वाहतूक सुरू झाली. त्यानंतर अखेर वायुसेनेची दोन ‘सी-१७’ विमाने मंगळवारी सकाळी काबूलमध्ये दाखल झाली. दूतावासातील कर्मचारी, सुरक्षा जवान, तसेच काही पत्रकारांना घेऊन हे विमान मायदेशी परतले. तालिबानने ठिकठिकाणी चेकपॉइंट उभारले आहेत. त्यामुळे भारतीयांना दूतावासातून विमानतळापर्यंतचे अवघे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यात मोठे अडथळे आल्याची माहिती टंडन यांनी दिली.

प्रथमच उपराष्ट्रपती सालेह यांनी तालिबानविरोधात थोपटले दंडतालिबानपुढे शरणागती पत्करून राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केले असतानाच प्रथमच उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. राज्यघटनेचा आधार देऊन त्यांनी ही घोषणा केली. कोणत्याही स्थितीत तालिबान्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केली. तालिबानला फार प्रतिकाराविना जवळपास सर्व प्रांत काबीज करता आले. काबूलमध्येही त्यांना सहज प्रवेश मिळाला. मात्र, सालेह यांच्या भूमिकेमुळे नव्याने सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान