शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 05:56 IST

Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते.

नवी दिल्ली : तालिबानने ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे काबूलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास भारताने सुरुवात केली आहे. भारतीय वायुसेनेची दोन विमाने २०० भारतीयांना घेऊन मायदेशी परत आली. ही विमाने गुजरातच्या जामनगर येथे दाखल झाली. त्यात भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. काबूलचे विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियाने काबूलहून विशेष उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू असताना तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने अडचण निर्माण झाली होती.

तोवर सेवा सुरूच राहणारभारताने अफगाणिस्तानातून राजदूतांसह दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी १९९६ नंतर पुन्हा एकदा तेथील दूतावास बंद झाला आहे. मात्र, अद्यापही काही भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी एअर इंड‍ियाने विशेष विमाने उडविण्याचा निर्णय घेतला आहे. काबूल येथील विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियातर्फे विशेष विमाने उडविणार असल्याची माहिती रुद्रेंद्र टंडन यांनी दिली.

पासपोर्टअभावी अनेक कामगार अडकलेउत्तर प्रदेशातील काही कामगार काबूलमधील एका कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. त्यांचे पासपोर्ट कंपनीच्या मालकाने ताब्यात घेतल्याचे या कामगारांनी सांगितले असून, आपल्याला लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची विनंती या कामगारांनी केली. 

भारतीयांना असे काढले बाहेरकाबूलचे विमानतळ अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे. त्यांनी विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर विमान वाहतूक सुरू झाली. त्यानंतर अखेर वायुसेनेची दोन ‘सी-१७’ विमाने मंगळवारी सकाळी काबूलमध्ये दाखल झाली. दूतावासातील कर्मचारी, सुरक्षा जवान, तसेच काही पत्रकारांना घेऊन हे विमान मायदेशी परतले. तालिबानने ठिकठिकाणी चेकपॉइंट उभारले आहेत. त्यामुळे भारतीयांना दूतावासातून विमानतळापर्यंतचे अवघे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यात मोठे अडथळे आल्याची माहिती टंडन यांनी दिली.

प्रथमच उपराष्ट्रपती सालेह यांनी तालिबानविरोधात थोपटले दंडतालिबानपुढे शरणागती पत्करून राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केले असतानाच प्रथमच उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. राज्यघटनेचा आधार देऊन त्यांनी ही घोषणा केली. कोणत्याही स्थितीत तालिबान्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केली. तालिबानला फार प्रतिकाराविना जवळपास सर्व प्रांत काबीज करता आले. काबूलमध्येही त्यांना सहज प्रवेश मिळाला. मात्र, सालेह यांच्या भूमिकेमुळे नव्याने सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान