शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका; संघटना म्हणते, आम्ही सर्व परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 05:56 IST

Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते.

नवी दिल्ली : तालिबानने ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे काबूलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास भारताने सुरुवात केली आहे. भारतीय वायुसेनेची दोन विमाने २०० भारतीयांना घेऊन मायदेशी परत आली. ही विमाने गुजरातच्या जामनगर येथे दाखल झाली. त्यात भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. काबूलचे विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियाने काबूलहून विशेष उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू असताना तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने अडचण निर्माण झाली होती.

तोवर सेवा सुरूच राहणारभारताने अफगाणिस्तानातून राजदूतांसह दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी १९९६ नंतर पुन्हा एकदा तेथील दूतावास बंद झाला आहे. मात्र, अद्यापही काही भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी एअर इंड‍ियाने विशेष विमाने उडविण्याचा निर्णय घेतला आहे. काबूल येथील विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियातर्फे विशेष विमाने उडविणार असल्याची माहिती रुद्रेंद्र टंडन यांनी दिली.

पासपोर्टअभावी अनेक कामगार अडकलेउत्तर प्रदेशातील काही कामगार काबूलमधील एका कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. त्यांचे पासपोर्ट कंपनीच्या मालकाने ताब्यात घेतल्याचे या कामगारांनी सांगितले असून, आपल्याला लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची विनंती या कामगारांनी केली. 

भारतीयांना असे काढले बाहेरकाबूलचे विमानतळ अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे. त्यांनी विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर विमान वाहतूक सुरू झाली. त्यानंतर अखेर वायुसेनेची दोन ‘सी-१७’ विमाने मंगळवारी सकाळी काबूलमध्ये दाखल झाली. दूतावासातील कर्मचारी, सुरक्षा जवान, तसेच काही पत्रकारांना घेऊन हे विमान मायदेशी परतले. तालिबानने ठिकठिकाणी चेकपॉइंट उभारले आहेत. त्यामुळे भारतीयांना दूतावासातून विमानतळापर्यंतचे अवघे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यात मोठे अडथळे आल्याची माहिती टंडन यांनी दिली.

प्रथमच उपराष्ट्रपती सालेह यांनी तालिबानविरोधात थोपटले दंडतालिबानपुढे शरणागती पत्करून राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केले असतानाच प्रथमच उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. राज्यघटनेचा आधार देऊन त्यांनी ही घोषणा केली. कोणत्याही स्थितीत तालिबान्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केली. तालिबानला फार प्रतिकाराविना जवळपास सर्व प्रांत काबीज करता आले. काबूलमध्येही त्यांना सहज प्रवेश मिळाला. मात्र, सालेह यांच्या भूमिकेमुळे नव्याने सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान