शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Afghanistan Crisis: माझ्यासोबत गुन्हेगारासारखं वर्तन, विमानतळावरून परत पाठवलं; अफगाण खासदाराचा भारतावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 09:18 IST

Afghanistan Crisis: महात्मा गांधींचा देश असलेल्या भारताकडून मला ही अपेक्षा नव्हती; अफगाण खासदाराकडून नाराजी व्यक्त

नवी दिल्ली/काबुल: अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून परिस्थिती बिघडत चालली आहे. तालिबान्यांच्या दहशतीत जीवन जगण्यापेक्षा लाखो लोक देश सोडून जाणं पसंत करत आहेत. देशातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी, राजकीय नेत्यांनीदेखील परदेशांमध्ये आश्रय घेतला आहे. महिला खासदार रंगीना करगर यांचादेखील असाच प्रयत्न होता. त्यासाठी त्या भारतात आल्या. मात्र आपल्याला नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून माघारी पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. करगर यांनी भारतावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

१५ ऑगस्टला काबूलवर तालिबाननं कब्जा केला. त्यानंतर ५ दिवसांनी करगर दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. मात्र त्यांना तिथून माघारी पाठवण्यात आलं. आपल्यासोबत एखाद्या गुन्हेगारासारखं वर्तन करण्यात आलं. महात्मा गांधींच्या भारताकडून मला अशी अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत करगर यांनी नाराजी व्यक्त केली.

द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, २० ऑगस्टला रंगीना करगर इस्तंबूलहून दिल्लीच्या विमानतळावर आल्या होत्या. त्यांच्याकडे डिप्लॉमॅटिक पासपोर्ट होता. या पासपोर्टमुळे व्हिसाशिवाय भारतात प्रवास करण्याची परवानगी मिळते. करगर याच पासपोर्टच्या आधारे अनेकदा भारतात आल्या होत्या, असा त्यांचा दावा आहे. मात्र यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना बराच वेळ वाट पाहण्यास सांगितली. जवळपास २ तास त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर त्यांना दुबईमार्गे इस्तंबूलला पाठवण्यात आलं.

'माझ्यासोबत जे झालं, ते चुकीचं होतं. काबुलमधील परिस्थिती बदलली आहे. भारत सरकार अफगाण महिलांची मदत करेल अशी मला अपेक्षा होती. मला माझा पासपोर्टदेखील दुबईत नव्हे, तर इस्तंबूलमध्ये मिळाला. एखाद्या गुन्हेगारासोबत जसं वर्तन केलं जातं, तसं वर्तन माझ्यासोबत करण्यात आलं,' अशा शब्दांत करगर यांनी नाराजी बोलून दाखवली. ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत भारतानं अफगाणच्या २ शीख खासदारांचं स्वागत केलं, याकडेही करगर यांनी लक्ष वेधलं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान