शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Afghanistan Crisis: माझ्यासोबत गुन्हेगारासारखं वर्तन, विमानतळावरून परत पाठवलं; अफगाण खासदाराचा भारतावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 09:18 IST

Afghanistan Crisis: महात्मा गांधींचा देश असलेल्या भारताकडून मला ही अपेक्षा नव्हती; अफगाण खासदाराकडून नाराजी व्यक्त

नवी दिल्ली/काबुल: अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून परिस्थिती बिघडत चालली आहे. तालिबान्यांच्या दहशतीत जीवन जगण्यापेक्षा लाखो लोक देश सोडून जाणं पसंत करत आहेत. देशातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी, राजकीय नेत्यांनीदेखील परदेशांमध्ये आश्रय घेतला आहे. महिला खासदार रंगीना करगर यांचादेखील असाच प्रयत्न होता. त्यासाठी त्या भारतात आल्या. मात्र आपल्याला नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून माघारी पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. करगर यांनी भारतावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

१५ ऑगस्टला काबूलवर तालिबाननं कब्जा केला. त्यानंतर ५ दिवसांनी करगर दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. मात्र त्यांना तिथून माघारी पाठवण्यात आलं. आपल्यासोबत एखाद्या गुन्हेगारासारखं वर्तन करण्यात आलं. महात्मा गांधींच्या भारताकडून मला अशी अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत करगर यांनी नाराजी व्यक्त केली.

द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, २० ऑगस्टला रंगीना करगर इस्तंबूलहून दिल्लीच्या विमानतळावर आल्या होत्या. त्यांच्याकडे डिप्लॉमॅटिक पासपोर्ट होता. या पासपोर्टमुळे व्हिसाशिवाय भारतात प्रवास करण्याची परवानगी मिळते. करगर याच पासपोर्टच्या आधारे अनेकदा भारतात आल्या होत्या, असा त्यांचा दावा आहे. मात्र यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना बराच वेळ वाट पाहण्यास सांगितली. जवळपास २ तास त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर त्यांना दुबईमार्गे इस्तंबूलला पाठवण्यात आलं.

'माझ्यासोबत जे झालं, ते चुकीचं होतं. काबुलमधील परिस्थिती बदलली आहे. भारत सरकार अफगाण महिलांची मदत करेल अशी मला अपेक्षा होती. मला माझा पासपोर्टदेखील दुबईत नव्हे, तर इस्तंबूलमध्ये मिळाला. एखाद्या गुन्हेगारासोबत जसं वर्तन केलं जातं, तसं वर्तन माझ्यासोबत करण्यात आलं,' अशा शब्दांत करगर यांनी नाराजी बोलून दाखवली. ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत भारतानं अफगाणच्या २ शीख खासदारांचं स्वागत केलं, याकडेही करगर यांनी लक्ष वेधलं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान