शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: माझ्यासोबत गुन्हेगारासारखं वर्तन, विमानतळावरून परत पाठवलं; अफगाण खासदाराचा भारतावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 09:18 IST

Afghanistan Crisis: महात्मा गांधींचा देश असलेल्या भारताकडून मला ही अपेक्षा नव्हती; अफगाण खासदाराकडून नाराजी व्यक्त

नवी दिल्ली/काबुल: अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून परिस्थिती बिघडत चालली आहे. तालिबान्यांच्या दहशतीत जीवन जगण्यापेक्षा लाखो लोक देश सोडून जाणं पसंत करत आहेत. देशातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी, राजकीय नेत्यांनीदेखील परदेशांमध्ये आश्रय घेतला आहे. महिला खासदार रंगीना करगर यांचादेखील असाच प्रयत्न होता. त्यासाठी त्या भारतात आल्या. मात्र आपल्याला नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून माघारी पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. करगर यांनी भारतावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

१५ ऑगस्टला काबूलवर तालिबाननं कब्जा केला. त्यानंतर ५ दिवसांनी करगर दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. मात्र त्यांना तिथून माघारी पाठवण्यात आलं. आपल्यासोबत एखाद्या गुन्हेगारासारखं वर्तन करण्यात आलं. महात्मा गांधींच्या भारताकडून मला अशी अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत करगर यांनी नाराजी व्यक्त केली.

द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, २० ऑगस्टला रंगीना करगर इस्तंबूलहून दिल्लीच्या विमानतळावर आल्या होत्या. त्यांच्याकडे डिप्लॉमॅटिक पासपोर्ट होता. या पासपोर्टमुळे व्हिसाशिवाय भारतात प्रवास करण्याची परवानगी मिळते. करगर याच पासपोर्टच्या आधारे अनेकदा भारतात आल्या होत्या, असा त्यांचा दावा आहे. मात्र यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना बराच वेळ वाट पाहण्यास सांगितली. जवळपास २ तास त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर त्यांना दुबईमार्गे इस्तंबूलला पाठवण्यात आलं.

'माझ्यासोबत जे झालं, ते चुकीचं होतं. काबुलमधील परिस्थिती बदलली आहे. भारत सरकार अफगाण महिलांची मदत करेल अशी मला अपेक्षा होती. मला माझा पासपोर्टदेखील दुबईत नव्हे, तर इस्तंबूलमध्ये मिळाला. एखाद्या गुन्हेगारासोबत जसं वर्तन केलं जातं, तसं वर्तन माझ्यासोबत करण्यात आलं,' अशा शब्दांत करगर यांनी नाराजी बोलून दाखवली. ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत भारतानं अफगाणच्या २ शीख खासदारांचं स्वागत केलं, याकडेही करगर यांनी लक्ष वेधलं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान