शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

IAS Success Story: वडिलांनी घर विकून UPSC च्या तयारीसाठी पाठवलं; पहिल्या प्रयत्नात प्रदीप झाला IRS, नंतर बनला IAS 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 10:32 IST

UPSC परीक्षांमध्ये अनेकदा उमेदवाराला पहिल्या प्रयत्नात यश मिळतं. परंतु IAS अधिकारी होण्यासाठी ते पुन्हाही प्रयत्न करताना दिसतात.

ठळक मुद्देप्रदीपच्या युपीएससीच्या स्वप्नासाठी वडिलांनी विकलं होतं घरपहिल्या प्रयत्नात झाला आयआरएस, दुसऱ्या प्रयत्नात झाला आयएएस

Success Story Of IAS Topper Pradeep Singh: २०१९ मध्ये पार पडलेल्या युपीएससीच्या परीक्षांमध्ये संपूर्ण भारतातून २६ वा क्रमांक पटकावलेल्या प्रदीप सिंह यांची गोष्ट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रदीपच्या वडिलांनी त्याच्या युपीएससीच्या तयारीसाठी आपलं घर विकलं आणि त्याला दिल्लीला पाठवलं होतं. प्रदीपनं जवळपास दीड वर्ष दिवसरात्र एक करून या परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाला. परंतु रँकनुसार त्याला आयआरएस सेवा मिळाली. लहानपणापासूनच प्रदीपचं स्वप्न एक आयएएस अधिकारी बनण्याचं होतं. म्हणूनच त्यानं दुसरा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा संपूर्ण भारतातून २६ वा क्रमांक आला आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं.प्रदीप मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आणि लहानपणापासूनच अभ्यासातही हुशार. याचमुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याला युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. यासाठीच प्रदीपनं पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र मेहनत करून त्यांनं पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवलं.पहिल्यापासूनच एक रणनिती आखून आपण या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय प्रदीपनं घेतला होता. याप्रकारे त्यानं आपल्या परीक्षेची तयारी सुरू केली. दीड वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्यानं आपली पहिली परीक्षा दिली आणि त्याच परीक्षेत त्याला यशही मिळालं. त्याच्या रँकनुसार त्याची निवड आयआरएस सेवेसाठी करण्यात आली. परंतु त्याच्या मनात आयएएसचं स्वप्न होतं. म्हणून त्यानं दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातही त्याला यश मिळालं.उमेदवारांना सल्लाप्रदीपनं नॉलेज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी उलगडा केला आहे. त्यानं युपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्लाही दिला आहे. युपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला धैर्यानं सतत मेहनत करावी लागेल. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक रणनिती तयार करणं आवश्यक आहे आणि त्याचीच अंमलबजावणी करून तुम्ही यश मिळवू शकता. अनेकदा आपल्याला यात अपयशही येतं. परंतु त्यातून निराश होण्याची गरज नाही. कठोर मेहनत ही तुम्हाला एक दिवस यश मिळवूनच देईल, असा सल्लाही त्यानं दिला आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगdelhiदिल्लीIndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी