शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यानं बनवला 'असा' अविष्कार; मंत्र्यांपासून सरकारच मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 07:53 IST

इंद्रेश दिव्यांग असला तरी त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंद्रेशच्या या अविष्कारामुळे उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही त्याचा सन्मान केला आहे.

सोनभद्र – भारतात दरवर्षी रस्ते अपघातात हजारो लोकांचा जीव जातो. रस्ते अपघात रोखण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्नशील असते. परंतु रस्ते अपघाताचा वेग कमी होताना दिसत नाही. हे अपघात रोखण्यासाठी सोनभद्र येथील १२ वीच्या वर्गात शिकणारा दिव्यांग विद्यार्थी इंद्रेश कुमारने अनोखा अविष्कार बनवला आहे. एक असं हेल्मेट जे रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकते.

हे हेल्मेटला बाइकला कनेक्ट केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही हेल्मेट घालत नाही तोवर बाईक सुरूच होणार नाही. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीच्या तोंडातून दारूचा वास येत असेल तेव्हाही बाईक सुरू होणार नाही. त्यामुळे हेल्मेट न घातल्यामुळे होणाऱ्या अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल आणि ड्रंक अँन्ड ड्राईव्हला आळा बसेल. इंद्रेश कुमार सोनभद्रच्या रॉबर्ट्सगंज तालुक्यातील मधुपूर गावात राहणारा आहे. तो ज्योती इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. दिव्यांग असल्याने त्याला पायाने चालता येत नाही.

इंद्रेश दिव्यांग असला तरी त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंद्रेशच्या या अविष्कारामुळे उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही त्याचा सन्मान केला आहे. इंद्रेश आता त्याने बनवलेल्या अनोख्या हेल्मेटचे पेटेंट घेण्याच्या तयारीत आहे. इंद्रेशने बनवलेले हेल्मेट घातल्यानंतर रस्ते दुर्घटनेत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. इंद्रेशचे वडील एका रस्ते अपघातात जखमी झाले होते. तेव्हा इंद्रेशला अशाप्रकारचा हेल्मेट बनवण्याची कल्पना सुचली. २ वर्षापूर्वी इंद्रेशचे वडील दारू पिऊन दुचाकी चालवत होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला आणि ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर असं हेल्मेट बनवण्याचा विचार इंद्रेशने केला ज्याने दारू प्यायल्याने दुचाकी स्टार्ट होणार नाही. त्यासोबतच हेल्मेट नसेल तरीही दुचाकी बंदच राहील.

डिसेंबर २०२२ मध्ये जिल्हा मुख्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत इंद्रेशने आपला आविष्कार दाखवला. यानंतर लोकांचे लक्ष या शोधाकडे गेले आणि त्याचे खूप कौतुक झाले. इंद्रेश कुमार गरीब कुटुंबातील असून त्यांच्याकडे फक्त २ एकर जमीन आहे. त्याचे वडील रामावतार हे शेतकरी आहेत आणि आई कमलावती देवी गृहिणी आहेत. त्याला दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असून त्या अनुक्रमे ९वी, १०वी आणि ७वी मध्ये शिकत आहेत.

परिवहनमंत्र्यांनीही केलं कौतुक, आरटीओ मिर्झापूर करतंय मदत

या अविष्कारानंतर परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनीही इंद्रेशचं संशोधन पाहिले आणि त्याचे कौतुक केले. त्याला लखनौला बोलावून ५०००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यानंतर, एआरटीओ धनवीर यादव सोनभद्र आणि आरटीओ मिर्झापूर देखील त्याला मदत करत आहेत, जेणेकरून त्याला त्याच्या शोधाचे पेटंट मिळू शकेल. सध्या मी माझ्या अविष्कारात आणखी सुधारणा करत आहे, माझ्या संशोधनाची केवळ सोनभद्र जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चा आहे असं इंद्रेश कुमारनं सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातbikeबाईक