शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Women's Hockey World Cup : भारतीय महिला संघाने हरूनही जिंकली मनं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 16:13 IST

मुंबई - महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत 44 वर्षांनंतर भारतीय महिला संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची स्वप्न थोडक्यात हुकले. कडव्या संघर्षानंतरही भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. त्याचबरोबर 2022च्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची संधीही गमावली. पण, स्पर्धेतील एकंदर कामगिरीवर ...

मुंबई - महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत 44 वर्षांनंतर भारतीय महिला संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची स्वप्न थोडक्यात हुकले. कडव्या संघर्षानंतरही भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले. त्याचबरोबर 2022च्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याची संधीही गमावली. पण, स्पर्धेतील एकंदर कामगिरीवर क्रीडा जगतातील दिग्गजांनी समाधान व्यक्त केले आहे. 

भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत संपूर्ण 60 मिनिटे आयर्लंडच्या आक्रमणपटूंना रोखले. आयर्लंडचे खेळाडू सातत्याने पेनल्टी क्षेत्रावर आक्रमण करत असताना भारतीय बचावपटूंनी त्यांना यश मिळू दिले नाही. गोलरक्षक सविता पुनियाला याचे अधिक श्रेय द्यायला हवे. पेनल्टी शूटआऊटमध्येही तीने आयर्लंडचे प्रयत्न रोखले, परंतु निर्णायक क्षणी तिला अपयश आले. 

2010 नंतर प्रथमच भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत खेळला आणि त्यातही समाधानकारक कामगिरी केली. भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्कीने महिला खेळाडूंचे कौतुक करताना म्हटले की, भारताच्या मुलींनी अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्यांनी त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. हेच महत्त्वाचे आहे. संघाने सर्वोत्तम खेळ केला, परंतु आजचा दिवस आयर्लंडचा होता. त्यामुळे हताश होऊ नका, पुढील स्पर्धांसाठी आणखी जिद्दीने खेळ करा.

माजी ऑलिम्पिक धावपटू पी. टी. उषा यांनीही भारतीय खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्या म्हणाल्या, तुम्हा मुलींचे अभिनंदन. निकाल जरी आपल्याला हवा तसा लागला नसला तरी तुम्ही दाखवलेल्या संघर्षाला सलाम. 

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही कौतुक करणारे ट्विट केले. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा