शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

2016 पासून महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाली!, कर्णधार राणी रामपालचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 08:35 IST

Rani Rampal : २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या मते टोकियो ऑलिम्पिकमधील अविस्मरणीय कामगिरीमुळे खेळाडूंना अत्यंत दडपणाच्या स्थितीतही शानदार खेळ करण्याचा मंत्र मिळाला. २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

‘हॉकी पे चर्चा’ या पॉडकास्टमध्ये  राणीने टोकियोत मिळालेले चौथे स्थान ते २०२१ मधील अनेक संस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. राणी म्हणाली,‘२०२१ आमच्यासाठी शानदार ठरले. आम्ही टोकियोत पदक जिंकू शकलो असतो.  असे करू शकलो नाही याची नेहमीसाठी खंत असेल. पदक मिळविण्याच्या फारच जवळ होतो. पराभव कसा झाला, हे काही काळ पचविणेदेखील जड गेले होते.

‘आम्ही २०१५ ला रिओ ऑलिम्पिकमध्ये १२ व्या आणि २०२० मध्ये टोकियोत चौथ्या स्थानावर राहिलो. भारतीय महिला हॉकीसाठी ही मोठी उपलब्धी आहे. कांस्य जिंकले नाही, पण कामगिरीत आमचे खेळाडू सरस ठरले. टोकियोतून मायदेशात परतलो तेव्हा चाहत्यांनी आमच्या कामगिरीचे कौतुक केले. काही चांगले केल्यामुळेच चाहत्यांचे प्रेम आणि प्रशंसा मिळू शकली. यामुळे भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास प्राप्त झाला,’ असे राणीने सांगितले.

‘टोकियोत उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव केल्यामुळे आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. यामुळे उपांत्य सामन्यात विश्वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाला नमवू शकतो, असे वाटले होते. उपांत्य सामना जिंकू शकलो असतो. सुरुवातीपासून आघाडी मिळवून प्रतिस्पर्धी संघावर दडपणही आणले होते. कोचने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात केली. पेनल्टी कॉर्नरही मिळविले, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरलो.  खेळाडूंसाठी ही शिकण्याची आणि अनुभव मिळविण्याची मोठी संधी ठरली. यापुढे आमचे खेळाडू बाद फेरीच्या सामन्यात संयमी खेळ करू शकतील. आम्ही निश्चितपणे उत्कृष्ट कामगिरी करू,’ असा मला विश्वास आहे.’     - राणी रामपाल

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत