शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

2016 पासून महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाली!, कर्णधार राणी रामपालचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 08:35 IST

Rani Rampal : २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या मते टोकियो ऑलिम्पिकमधील अविस्मरणीय कामगिरीमुळे खेळाडूंना अत्यंत दडपणाच्या स्थितीतही शानदार खेळ करण्याचा मंत्र मिळाला. २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

‘हॉकी पे चर्चा’ या पॉडकास्टमध्ये  राणीने टोकियोत मिळालेले चौथे स्थान ते २०२१ मधील अनेक संस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. राणी म्हणाली,‘२०२१ आमच्यासाठी शानदार ठरले. आम्ही टोकियोत पदक जिंकू शकलो असतो.  असे करू शकलो नाही याची नेहमीसाठी खंत असेल. पदक मिळविण्याच्या फारच जवळ होतो. पराभव कसा झाला, हे काही काळ पचविणेदेखील जड गेले होते.

‘आम्ही २०१५ ला रिओ ऑलिम्पिकमध्ये १२ व्या आणि २०२० मध्ये टोकियोत चौथ्या स्थानावर राहिलो. भारतीय महिला हॉकीसाठी ही मोठी उपलब्धी आहे. कांस्य जिंकले नाही, पण कामगिरीत आमचे खेळाडू सरस ठरले. टोकियोतून मायदेशात परतलो तेव्हा चाहत्यांनी आमच्या कामगिरीचे कौतुक केले. काही चांगले केल्यामुळेच चाहत्यांचे प्रेम आणि प्रशंसा मिळू शकली. यामुळे भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास प्राप्त झाला,’ असे राणीने सांगितले.

‘टोकियोत उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव केल्यामुळे आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. यामुळे उपांत्य सामन्यात विश्वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाला नमवू शकतो, असे वाटले होते. उपांत्य सामना जिंकू शकलो असतो. सुरुवातीपासून आघाडी मिळवून प्रतिस्पर्धी संघावर दडपणही आणले होते. कोचने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात केली. पेनल्टी कॉर्नरही मिळविले, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरलो.  खेळाडूंसाठी ही शिकण्याची आणि अनुभव मिळविण्याची मोठी संधी ठरली. यापुढे आमचे खेळाडू बाद फेरीच्या सामन्यात संयमी खेळ करू शकतील. आम्ही निश्चितपणे उत्कृष्ट कामगिरी करू,’ असा मला विश्वास आहे.’     - राणी रामपाल

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत