शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

2016 पासून महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाली!, कर्णधार राणी रामपालचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 08:35 IST

Rani Rampal : २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या मते टोकियो ऑलिम्पिकमधील अविस्मरणीय कामगिरीमुळे खेळाडूंना अत्यंत दडपणाच्या स्थितीतही शानदार खेळ करण्याचा मंत्र मिळाला. २०१६ च्या रिओ ते २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात भारतीय महिला हॉकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे मत २७ वर्षांच्या राणीने व्यक्त केले.

‘हॉकी पे चर्चा’ या पॉडकास्टमध्ये  राणीने टोकियोत मिळालेले चौथे स्थान ते २०२१ मधील अनेक संस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. राणी म्हणाली,‘२०२१ आमच्यासाठी शानदार ठरले. आम्ही टोकियोत पदक जिंकू शकलो असतो.  असे करू शकलो नाही याची नेहमीसाठी खंत असेल. पदक मिळविण्याच्या फारच जवळ होतो. पराभव कसा झाला, हे काही काळ पचविणेदेखील जड गेले होते.

‘आम्ही २०१५ ला रिओ ऑलिम्पिकमध्ये १२ व्या आणि २०२० मध्ये टोकियोत चौथ्या स्थानावर राहिलो. भारतीय महिला हॉकीसाठी ही मोठी उपलब्धी आहे. कांस्य जिंकले नाही, पण कामगिरीत आमचे खेळाडू सरस ठरले. टोकियोतून मायदेशात परतलो तेव्हा चाहत्यांनी आमच्या कामगिरीचे कौतुक केले. काही चांगले केल्यामुळेच चाहत्यांचे प्रेम आणि प्रशंसा मिळू शकली. यामुळे भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास प्राप्त झाला,’ असे राणीने सांगितले.

‘टोकियोत उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव केल्यामुळे आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. यामुळे उपांत्य सामन्यात विश्वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाला नमवू शकतो, असे वाटले होते. उपांत्य सामना जिंकू शकलो असतो. सुरुवातीपासून आघाडी मिळवून प्रतिस्पर्धी संघावर दडपणही आणले होते. कोचने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात केली. पेनल्टी कॉर्नरही मिळविले, पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरलो.  खेळाडूंसाठी ही शिकण्याची आणि अनुभव मिळविण्याची मोठी संधी ठरली. यापुढे आमचे खेळाडू बाद फेरीच्या सामन्यात संयमी खेळ करू शकतील. आम्ही निश्चितपणे उत्कृष्ट कामगिरी करू,’ असा मला विश्वास आहे.’     - राणी रामपाल

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत