शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

Asian Games 2018: जकार्तामध्ये इतिहास घडवायला आलो आहोत; हॉकी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 16:16 IST

Asian Games 2018: कुठल्याही भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत कधीच सलग दोन सुवर्ण पदकं  जिंकलेली  नाहीत. आम्ही जकार्ता मध्ये इतिहास घडवायला आलो आहोत

अभिजित देशमुख"कुठल्याही भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत कधीच सलग दोन सुवर्ण पदकं  जिंकलेली  नाहीत. आम्ही जकार्ता मध्ये इतिहास घडवायला आलो आहोत " असे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

"आम्हाला आत्मविश्वास आहे, मात्र अतिआत्मविश्वास नाही, आम्हाला माहित आहे की, आम्ही कोणत्याही विरोधी संघाला कमी लेखू शकत नाही. खरं तर स्पर्धेच्या अशा पातळीवर कुठलाही संघ विरोधी संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. आम्ही चांगले प्रदर्शन करत आहोत,  सर्व खेळाडू फिट आहेत आणि उत्सुकतेने पहिल्या सामन्याची वाट पाहत आहेत," असे सिंग यांनी सांगितले.  

भारतीय पुरुष संघ 'अ' गटात असून दक्षिण कोरिया, जपान, श्रीलंका, हाँगकाँग आणि यजमान इंडोनेशिया यांचाही या  गटात  समावेश आहे. २० ऑगस्टला भारताची यजमान इंडोनेशियाशी गाठ आहे.  "हा गट सोपा नाही, माजी विजेता कोरिया, जपान आणि हाँगकाँग हे  बलाढ्य संघ आहेत. आमचे डावपेच अगदी साधे आहेत, मला क्लिष्ट धोरणामध्ये विश्वास नाही. खेळाडूंना माझा सल्ला सरळ आणि सोपे हॉकी खेळण्याचा आहे. खेळाडूंना याची जाणीव आहे की 2020 च्या टोकियो ओलंपिकमध्ये आम्हाला थेट प्रवेश इथूनच मिळेल. खेळाडूंच्या  फिटनेसच्या बाबतीत  कोणत्याही प्रकारची  तडजोड करणार नाही. आजच्या  हॉकी युगात खेळामध्ये कौशल्य तर पाहिजेच सोबत गती असणे अत्यावश्यक आहे. सामन्यात, शंभर टक्के फिटनेस आणि गती असणे अत्यावश्यक आहे. अॅस्ट्रोटर्फवर ६० मिनटं टिकून राहणे सोपं नाही, त्यामुळे प्रारंभी अकरा खेळाडूं निवडताना  फिटनेस आणि गती या दोन गोष्टीचा विचार केला जाणार आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले.

सिंग यांनी इतर संघांविषयी  विशेषकरून पाकिस्तानविषयी बोलण्यास नकार दिला. "इतर संघांबद्दल काही विचार करू नका, लक्ष केंद्रित करा  आणि फिट रहा असा सोपा सल्ला मी खेळाडूंना दिला आहे. आम्ही प्रत्येक विरोध गंभीरपणे घेतो कारण, त्यामुळे एक योजना तयार होते, आम्ही प्रत्येक सामन्यासाठी परिस्थितीनुसार योजना करतो. या स्पर्धेत आम्ही सर्वोच्च स्थानावर आहोत आणि त्यामुळे इतर संघांपेक्षा आम्हाला मानसिक फायदा सुद्धा होतो परंतु समन्याच्या दिवशी संघ कशा प्रकारे  खेळतो यावर सर्वकाही अवलंबून असते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमचे  पेनल्टी कॉर्नरच्या वेळी  प्रदर्शन  फार चांगले नव्हते. आम्हाला त्यामध्ये  सुधारणे आवश्यक आहे आणि आम्ही त्यावर काम करीत आहोत. आम्ही पेनल्टी कॉर्नरमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आम्हाला जास्तीत जास्त गोल करून आघाडी घेऊन ती राखून ठेवायाची आहे,'' असेही त्यांनी सांगितले. 

कर्णधार पी आर श्रीजेश म्हणाला की, " सर्व खेळाडूं फिट आहेत, हा  संघ अतिशय संतुलित आहे. सरासरी सर्व खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. केवळ दोन किंवा तीन खेळाडूंनी कमी सामने खेळले आहेत."

"येथील  विजय आम्हाला टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जवळजवळ दोन वर्षे देईल, येथील  चांगल्या  कामगिरीमुळे विश्वचषकापूर्वी संघाचे मनोबल वाढेल", असे मत माजी कर्णधार व मिडफिएल्डर सरदार सिंग यांनी  व्यक्त केले. 

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८HockeyहॉकीIndiaभारत