शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:06 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यांसाठी २४ मे ते ७ जून या कालावधीत उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यांसाठी २४ मे ते ७ जून या कालावधीत उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.शेतकºयांना सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग हळद या प्रमुख पिकांसाठी आधुनिक व अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, विविध शासकीय योजना, अभियान, उपक्रमांची माहिती व त्याचा लाभ घेण्याच्या कार्यपद्धतीबाबत जनजागृती, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकºयांत जनजागृती करणे, बीजप्रक्रियेबाबत शेतकºयांमध्ये जागरुकता निर्माण करणे, पीकविमा योजनेत जास्तीत-जास्त शेतकºयांना सहभागी होण्यास जागरुकता निर्माण करणे, कापसावरील शेंदरी बोंडअळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. आंतरपीक पद्धतीसह बहुवार पीक पद्धतीचीही माहिती दिली जाणार आहे. कृषीपूरक व्यवसायात पशुपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, रेशीम उद्योग आदींच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यासही सांगितले जाणार आहे.प्रगतीशिल शेतकºयांनी चांगले उत्पादन घेण्यासाठी अवलंबलेले नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान इतर शेतकºयांपर्यंत मोहोचविणे, एम.किसान पोर्टलच्या मोफत एसएमएस सुविधेचा लाभ देणे, गट/ समुहांच्या माध्यमातून शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन साखळी निर्माण करण्याबाबतही जागृती करण्यात येणार आहे.गेल्यावर्षी किटकनाशके फवारताना अनेक शेतकºयांना मृत्यूने गाठले. त्यामुळे शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, किती प्रमाणात तीव्र औषधांचा वापर करावा, अशी औषधी हाताळताना घ्यावयाची काळजी व आपत्तीतील काळजीचेही मार्गदर्शन करण्यात येईल. कृषी निविष्ठा खरेदीबाबतही माहिती दिली जाणार आहे. या पंधरवड्यात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी अधीक्षक व्ही.डी. लोखंडे यांनी केले.उन्नत शेती, समृद्ध अभियानाच्या निमित्ताने शेतकºयांना जागेवर मार्गदर्शन करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. मात्र खालच्या यंत्रणेनेही त्यासाठी तेवढीच जागरुकता दाखविणे गरजेचे आहे. अनेकदा या यंत्रणेची उदासीनता शेतकºयांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यात अडसर ठरते. पिकांची उत्पादकता, अनुवंशिक उत्पादनक्षमता आणि सध्या करावयाच्या उत्पादनवाढीचा लक्षांक याबाबत प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकºयास योग्य मार्गदर्शन मिळाले तरच त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे काहीजणच ही योजना राबवतील व इतर मोकळेच राहतील.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी