शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

यंदाही उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:06 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यांसाठी २४ मे ते ७ जून या कालावधीत उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यांसाठी २४ मे ते ७ जून या कालावधीत उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.शेतकºयांना सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग हळद या प्रमुख पिकांसाठी आधुनिक व अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, विविध शासकीय योजना, अभियान, उपक्रमांची माहिती व त्याचा लाभ घेण्याच्या कार्यपद्धतीबाबत जनजागृती, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकºयांत जनजागृती करणे, बीजप्रक्रियेबाबत शेतकºयांमध्ये जागरुकता निर्माण करणे, पीकविमा योजनेत जास्तीत-जास्त शेतकºयांना सहभागी होण्यास जागरुकता निर्माण करणे, कापसावरील शेंदरी बोंडअळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. आंतरपीक पद्धतीसह बहुवार पीक पद्धतीचीही माहिती दिली जाणार आहे. कृषीपूरक व्यवसायात पशुपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, रेशीम उद्योग आदींच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यासही सांगितले जाणार आहे.प्रगतीशिल शेतकºयांनी चांगले उत्पादन घेण्यासाठी अवलंबलेले नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान इतर शेतकºयांपर्यंत मोहोचविणे, एम.किसान पोर्टलच्या मोफत एसएमएस सुविधेचा लाभ देणे, गट/ समुहांच्या माध्यमातून शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन साखळी निर्माण करण्याबाबतही जागृती करण्यात येणार आहे.गेल्यावर्षी किटकनाशके फवारताना अनेक शेतकºयांना मृत्यूने गाठले. त्यामुळे शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, किती प्रमाणात तीव्र औषधांचा वापर करावा, अशी औषधी हाताळताना घ्यावयाची काळजी व आपत्तीतील काळजीचेही मार्गदर्शन करण्यात येईल. कृषी निविष्ठा खरेदीबाबतही माहिती दिली जाणार आहे. या पंधरवड्यात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी अधीक्षक व्ही.डी. लोखंडे यांनी केले.उन्नत शेती, समृद्ध अभियानाच्या निमित्ताने शेतकºयांना जागेवर मार्गदर्शन करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. मात्र खालच्या यंत्रणेनेही त्यासाठी तेवढीच जागरुकता दाखविणे गरजेचे आहे. अनेकदा या यंत्रणेची उदासीनता शेतकºयांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यात अडसर ठरते. पिकांची उत्पादकता, अनुवंशिक उत्पादनक्षमता आणि सध्या करावयाच्या उत्पादनवाढीचा लक्षांक याबाबत प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकºयास योग्य मार्गदर्शन मिळाले तरच त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे काहीजणच ही योजना राबवतील व इतर मोकळेच राहतील.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी