शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चिंताजनक ! पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखले, खेड्यात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:39 IST

सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.

हिंगोली : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईनच्या समन्वयाने जिल्ह्यात पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षणदेखील पूर्ण होत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते आणि पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो. लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडावे लागत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु समाजातील जागरुक नागरिक व ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईन (१०९८) या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात आले. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे १, हिंगोली तालुक्यातील कारवाडी येथे १, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे २ आणि वसमत तालुक्यातील पिंपळा (चौरे) येथे १ यांचा समावेश आहे.

बालविवाह रोखण्यासाठी बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, कायदा व परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, रामप्रसाद मुडे व ग्रावसेवक, ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने संबंधित बालिका व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाह रोखण्यात यश आले.

तर येथे संपर्क साधावा...सध्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वयाचा विचार करता बालविवाह होत आहेत. मुलींच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना बालविवाहास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. गावात अथवा इतर कोणत्याही ठिकाणी बालविवाह होत असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अथवा चाईल्ड लाईन (१०९८) या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील कोणताही नागरिक तसेच स्वत: बालक किंवा बालिका व स्वयंसेवी संस्थेने बालविवाह होत असल्यास किंवा बालकांसोबत गैरकृत्य होत असल्यास चाईल्ड लाईनकडे संपर्क साधावा.- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, हिंगोली

टॅग्स :marriageलग्नHingoliहिंगोली