शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:11 IST

सध्या पावसाने ओढ दिलेली असल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी कृषीपंपाने पाणी देत आहेत. मात्र अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता महावितरणनेही १00 टक्के वसुलीशिवाय संबंधित रोहित्र बदलून दिले जाणार नसल्याचे जाहीर निवेदन केल्याने शेतकऱ्यांची गोची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या पावसाने ओढ दिलेली असल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी कृषीपंपाने पाणी देत आहेत. मात्र अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता महावितरणनेही १00 टक्के वसुलीशिवाय संबंधित रोहित्र बदलून दिले जाणार नसल्याचे जाहीर निवेदन केल्याने शेतकऱ्यांची गोची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्याच दीडशेवर रोहित्र जळालेले आहेत. दररोज यात भर पडत आहे. मात्र जळालेले रोहीत्र बदलून देण्यासाठी कधी आॅईलची तर कधी इतर अडचण येते. महावितरणचा हा प्रश्न नेहमीचाच आहे. गतवर्षीही ऐन रबीच्या तोंडावरच महावितरणने वसुली सुरू केली होती. त्यावरून बरीच ओरडही झाली होती. मात्र वसुलीशिवाय रोहित्र देण्यात आले नव्हते.अनेकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.आता पुन्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता सु.बा.जाधव यांनी रोहित्र जळाल्यास त्या रोहित्रावरील १00 टक्के शेतकºयांनी थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र बदलून मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे आॅईलमुळे आधीच रोहित्र मिळत नसताना थकबाकी भरल्यावरही रोहित्र मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे आॅईलच्या समस्येवर तोडगा काढणे हे क्रमप्राप्त दिसत आहे. खरीप हंगाम हाती येत असल्याने महावितरणनकडून वसुलीसाठी फंडा वापरला जात असला तरीही पावसाने उघडीप दिल्याने हा हंगामच धोक्यात आहे. त्यामुळे आताच सक्ती केल्यास शेतकरी थकबाकी भरू शकेल, अशी शक्यता दिसत नाही.ऊर्जामंत्र्यांना भेटणारमहावितरणकडून शेतकºयांना रोहित्र बदलून दिले जात नाहीत. आॅईलसह अनेक समस्या सांगितल्या जात आहेत. तर अधिकाºयांना जाब विचारला तर पुढे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत आहेत, अशी तक्रार भाजप नेते रामरतन शिंदे यांनी उर्जामंत्र्यांकडे केली आहे. एवढेच नव्हे, तर याबाबत पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यामार्फत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे. पालकमंत्र्यांकडेही हा प्रश्न मांडल्याचे त्यांनी सांगितले. २00 नवीन डीपींसाठी उर्जामंत्र्यांना आग्रह धरण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले.आमदारांचेही निवेदनआ.तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरणच्या अधिकाºयांची बैठक नुकतीच बैठक घेतली. तर आता उर्जामंत्र्यांची भेट घेवून विविध वीज केंद्रांना निधी व डीपी दुरुस्तीस आॅईल व २00 नवीन डीपींची मागणी केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल