शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:11 IST

सध्या पावसाने ओढ दिलेली असल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी कृषीपंपाने पाणी देत आहेत. मात्र अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता महावितरणनेही १00 टक्के वसुलीशिवाय संबंधित रोहित्र बदलून दिले जाणार नसल्याचे जाहीर निवेदन केल्याने शेतकऱ्यांची गोची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या पावसाने ओढ दिलेली असल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी कृषीपंपाने पाणी देत आहेत. मात्र अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता महावितरणनेही १00 टक्के वसुलीशिवाय संबंधित रोहित्र बदलून दिले जाणार नसल्याचे जाहीर निवेदन केल्याने शेतकऱ्यांची गोची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्याच दीडशेवर रोहित्र जळालेले आहेत. दररोज यात भर पडत आहे. मात्र जळालेले रोहीत्र बदलून देण्यासाठी कधी आॅईलची तर कधी इतर अडचण येते. महावितरणचा हा प्रश्न नेहमीचाच आहे. गतवर्षीही ऐन रबीच्या तोंडावरच महावितरणने वसुली सुरू केली होती. त्यावरून बरीच ओरडही झाली होती. मात्र वसुलीशिवाय रोहित्र देण्यात आले नव्हते.अनेकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.आता पुन्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता सु.बा.जाधव यांनी रोहित्र जळाल्यास त्या रोहित्रावरील १00 टक्के शेतकºयांनी थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र बदलून मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे आॅईलमुळे आधीच रोहित्र मिळत नसताना थकबाकी भरल्यावरही रोहित्र मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे आॅईलच्या समस्येवर तोडगा काढणे हे क्रमप्राप्त दिसत आहे. खरीप हंगाम हाती येत असल्याने महावितरणनकडून वसुलीसाठी फंडा वापरला जात असला तरीही पावसाने उघडीप दिल्याने हा हंगामच धोक्यात आहे. त्यामुळे आताच सक्ती केल्यास शेतकरी थकबाकी भरू शकेल, अशी शक्यता दिसत नाही.ऊर्जामंत्र्यांना भेटणारमहावितरणकडून शेतकºयांना रोहित्र बदलून दिले जात नाहीत. आॅईलसह अनेक समस्या सांगितल्या जात आहेत. तर अधिकाºयांना जाब विचारला तर पुढे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत आहेत, अशी तक्रार भाजप नेते रामरतन शिंदे यांनी उर्जामंत्र्यांकडे केली आहे. एवढेच नव्हे, तर याबाबत पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यामार्फत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे. पालकमंत्र्यांकडेही हा प्रश्न मांडल्याचे त्यांनी सांगितले. २00 नवीन डीपींसाठी उर्जामंत्र्यांना आग्रह धरण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले.आमदारांचेही निवेदनआ.तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरणच्या अधिकाºयांची बैठक नुकतीच बैठक घेतली. तर आता उर्जामंत्र्यांची भेट घेवून विविध वीज केंद्रांना निधी व डीपी दुरुस्तीस आॅईल व २00 नवीन डीपींची मागणी केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल