शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे. ...

पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे. मागील वर्षभरापासून हे काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच शेतीपयोगी साहित्य शेतात नेण्यासाठी या पुलाच्या अपूर्ण कामामुळे मोठा त्रास होत आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

हिंगोली : आदर्श कॉलेजजवळील पाण्याच्या टाकीपासून शाहुनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता उताराचा असून, अनेक वाहने याठिकाणाहून वेगाने धावत असतात. पण, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना चुकविताना अनेक वाहनधारक पडत असल्याचे प्रकार घडले आहेत. यासाठी हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरवासियांसह वाहनधारकांतून होत आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित

औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. गावाचा वीजपुरवठा दोन महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. गावातील वीज खंडित राहात असल्याने गावकऱ्यांत महावितरणच्या कारभाराविषयी रोष निर्माण होत आहे. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेकांची वीज उपकरणेही जळाली आहेत. यामुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

आंबाचोंडी : कोरोना या महामारीमुळे हिंगोली रेल्वे स्थानकातील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. आता भारतातील सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी कोरोनामुळे बंद करण्यात आलेली ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. पॅसेंजर रेल्वेच्या तिकिटाच्या तुलनेत बस व इतर वाहनांचा खर्च जास्त असून, हा सामान्य नागरिकांना परवडत नाही. यासाठी ही सेवा जलदगतीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

रस्ता दुरूस्तीची मागणी

पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील चार महिन्यांपासून हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. यासाठी हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

वातावरण बदलामुळे रुग्ण संख्या वाढली

वसमत : मागील दोन दिवसांपासून अचानक ढगाळ वातावरण झाले आहे. या वातावरण बदलामुळे बालक आणि वयाेवृद्ध ग्रासले गेले आहेत. बालकांना ताप, हिवताप, खोकला, सर्दी तर वयोवृद्धांना दमा, अंगदुखी, डोकेदुखी असे रोग होत आहेत. वातावरण बदलामुळे तालुक्यातील अनेक रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत.

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : सध्या तालुक्यातील रोहयोचे काम सुरू नसल्यामुळे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह कामाच्या शोधात परगावी जात आहेत. तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मजूर वर्गाचा ताफा परगावी जात असल्याचे दिसत आहे.