शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कयाधूचे पात्र होणार खोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:44 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज कयाधूच्या पात्रातून उपसण्याची आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केलेली मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उचलून धरत तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे कयाधूच्या खोलीकरणाचा मार्ग आपोआपच मोकळा होणार असल्याचे चित्र आहे.

हिंगोली : राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज कयाधूच्या पात्रातून उपसण्याची आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केलेली मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उचलून धरत तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे कयाधूच्या खोलीकरणाचा मार्ग आपोआपच मोकळा होणार असल्याचे चित्र आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. या प्रश्नावर जो-तो बोलत आहे. अनेकजण त्यावर कामही करायला पुढाकार घेण्याची तयारी करीत आहेत. त्यातच काही संस्था, संघटनांनीही या प्रश्नात लक्ष घालून नदी पुनर्जीवनासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मात्र रामबाण उपाय काढला आहे. यासाठी त्यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले की, हिंगोली राष्ट्रीय महामार्ग १६१ कनेरगाव नाका ते हिंगोली रिसोड, सेंनगाव या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.या कामाच्या परिसरातून कयाधू नदी वाहते या नदीमध्ये जाड रेती, दगड, मुरूम, मोठ्या प्रमाणात आहे. या गौण खनिजाचे उत्खनन केल्यास रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल. तसेच यामुळे नदीचे पात्र खोल व रुंद होईल. ज्यामुळे नदीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढेल व नदीचे पात्र मोठे होईल तसेच करण्यात येणाऱ्या बंधाºयानंतर खोली आणि रुंदीमुळे पाणी जास्त प्रमाणात साठवल्या जाईल. यामुळे शेतकरी बांधवाना आता कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता नदीचे पात्र मोठे करता येईल. या संबंधीचे पत्र गडकरी यांना लेखी दिले. त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन गौण खनिज उत्खनन करू द्यावे, असे म्हटले. तर तुमच्या जिल्ह्यात यापुढे विकासासाठी जो निधी लागेल तो देण्यास तयार आहे, असा विश्वास दिला. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, के. के. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.बंधाºयांना फायदा : लवकर काम व्हावेआ.मुटकुळे यांनी दिलेल्या पत्रानुसार नदीच्या पात्रातून मुरुम व दगडयुक्त रेती काढण्याची परवानगी देण्याची मुभा गडकरी यांनी दिली. त्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली तर आगामी काळात सिंचन अनुशेषातून होणाºया बंधाºयाच्या कामांना त्याचा फायदा होणार आहे. या नदीचे पात्र सेनगाव तालुक्यात उथळ असल्याने या ठिकाणी बॅरेजेस होणार नसल्याची ओरड आहे. जे बंधारे होणार आहेत, त्यावर शेतकरी समाधानी होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासाठी उत्खनन झाले तर ते अधिक सोयीस्कर होणार आहे.कयाधूचे उत्खनन करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज वापरले तर उत्खननासाठी येणारा वेगळा खर्च आपोआपच टळणार आहे. लोकवर्गणीची गरज पडणार नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी