शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कयाधूचे पात्र होणार खोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:44 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज कयाधूच्या पात्रातून उपसण्याची आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केलेली मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उचलून धरत तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे कयाधूच्या खोलीकरणाचा मार्ग आपोआपच मोकळा होणार असल्याचे चित्र आहे.

हिंगोली : राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज कयाधूच्या पात्रातून उपसण्याची आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केलेली मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उचलून धरत तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे कयाधूच्या खोलीकरणाचा मार्ग आपोआपच मोकळा होणार असल्याचे चित्र आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. या प्रश्नावर जो-तो बोलत आहे. अनेकजण त्यावर कामही करायला पुढाकार घेण्याची तयारी करीत आहेत. त्यातच काही संस्था, संघटनांनीही या प्रश्नात लक्ष घालून नदी पुनर्जीवनासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मात्र रामबाण उपाय काढला आहे. यासाठी त्यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले की, हिंगोली राष्ट्रीय महामार्ग १६१ कनेरगाव नाका ते हिंगोली रिसोड, सेंनगाव या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.या कामाच्या परिसरातून कयाधू नदी वाहते या नदीमध्ये जाड रेती, दगड, मुरूम, मोठ्या प्रमाणात आहे. या गौण खनिजाचे उत्खनन केल्यास रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल. तसेच यामुळे नदीचे पात्र खोल व रुंद होईल. ज्यामुळे नदीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढेल व नदीचे पात्र मोठे होईल तसेच करण्यात येणाऱ्या बंधाºयानंतर खोली आणि रुंदीमुळे पाणी जास्त प्रमाणात साठवल्या जाईल. यामुळे शेतकरी बांधवाना आता कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता नदीचे पात्र मोठे करता येईल. या संबंधीचे पत्र गडकरी यांना लेखी दिले. त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन गौण खनिज उत्खनन करू द्यावे, असे म्हटले. तर तुमच्या जिल्ह्यात यापुढे विकासासाठी जो निधी लागेल तो देण्यास तयार आहे, असा विश्वास दिला. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, के. के. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.बंधाºयांना फायदा : लवकर काम व्हावेआ.मुटकुळे यांनी दिलेल्या पत्रानुसार नदीच्या पात्रातून मुरुम व दगडयुक्त रेती काढण्याची परवानगी देण्याची मुभा गडकरी यांनी दिली. त्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली तर आगामी काळात सिंचन अनुशेषातून होणाºया बंधाºयाच्या कामांना त्याचा फायदा होणार आहे. या नदीचे पात्र सेनगाव तालुक्यात उथळ असल्याने या ठिकाणी बॅरेजेस होणार नसल्याची ओरड आहे. जे बंधारे होणार आहेत, त्यावर शेतकरी समाधानी होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासाठी उत्खनन झाले तर ते अधिक सोयीस्कर होणार आहे.कयाधूचे उत्खनन करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज वापरले तर उत्खननासाठी येणारा वेगळा खर्च आपोआपच टळणार आहे. लोकवर्गणीची गरज पडणार नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी