शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल

By विजय पाटील | Updated: November 26, 2023 18:39 IST

'मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोध; एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्या.'

हिंगोली: मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती व मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा. ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केली. रामलीला मैदानावर झालेल्या या सभेस प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, खा.रामदास तडस, आ. प्रज्ञा सातव, आ. राजेश राठोड, टी. पी. मुंडे, माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. रामराव वडकुते, बबन तायवाडे आदी ओबीसी नेते उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, मी बोललो तर दोन समाजात तेढ निर्माण करू नका म्हणतात. पहिल्यांदा तर ते बोलले. तुमचा खुटा उपटील म्हणाले. करे कर काय करायचे ते? तरीही आम्ही बोललो नाही. आम्हाला दोन महिन्यांपासून रोज शिव्या घालताहेत. पोलिसही ते वाचू शकले नाहीत. जाळायला अक्कल लागत नाही जोडायला अक्कल लागते.

ओबीसीविरुद्ध षडयंत्र

एकीकडे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात दाद मागत आहेत. जे ओबीसीत आहेत, ते कसे चुकीचे आहेत, असे सांगून आमचे काढून त्यांना आरक्षण मागण्याचा डाव आहे, असेही भुजबळ म्हणाले.

ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला?

उपोषण नेते म्हणतात की, ओबीसींच्या हाताखाली काम करणे शोभत नाही. आमची लायकी नाही. याच नेमकं म्हणनं तरी काय? हे मराठा नेते का विचारत नाहीत. लायकी होती म्हणूनच अठरा पगड जातीतील शूरवीर छत्रपती शिवरायांसोबत लढले. ओबीसी देशाचा निर्माता आहे. शिवाय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी उमेदवार ओपनच्या बरोबरीची किंबहुना त्यापुढेही गुणवत्ता सिद्ध करीत असल्याचे सांगताना त्यांनी आकडेवारीचा दाखलाच भुजबळ यांनी दिला.

मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोधमराठा समाजाला वेगळे १२, १५ टक्के आरक्षण द्या. त्यासाठी आमच्यावर बुलडोझर चालवू नका. आमचा गरीब मराठ्यांना विरोध नाही. मात्र जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे. अंतरवाली प्रकरणातील आरोपी बेदरेकडे पिस्तूल आढळले. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. जर कुणाला गावबंदी केली तर एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. मग पोलिसांनी आतापर्यंत कुणावरच का कारवाई केली नाही? असा सवालही भुजबळ यांनी केला.

एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्याराहुल गांधी, शरद पवार, चंद्रशेखर बावनकुळे ही सगळीच मंडळी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे. येथेही अनेकांनी केली. एकदा अशी गणना होऊनच जाऊ द्या. बिहार अशी गणना करू शकते तर महाराष्ट्र का नाही करू शकत? असा सवालही भुजबळ यांनी केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळHingoliहिंगोलीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण