शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ८०० विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी १९ हजार ५१९ मुले नववीत होती. यात हिंगोली तालुक्यात ५३५८, सेनगावात २८९७, वसमतला ४९१६, कळमनुरीत ३९२०, ...

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी १९ हजार ५१९ मुले नववीत होती. यात हिंगोली तालुक्यात ५३५८, सेनगावात २८९७, वसमतला ४९१६, कळमनुरीत ३९२०, औंढ्यात २४२८ अशी तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या होती. यापैकी १० हजार २०१ मुले, तर ९ हजार ३१८ मुली होत्या. मात्र, यंदा दहावीत प्रवेश घेतलेल्यांची संख्या एवढीच राहणे अपेक्षित असताना ती १८ हजार ७१२ वर येऊन ठेपली आहे. यामध्ये हिंगोलीत ५०६१, सेनगाव २८७४, वसमत ४८३६, कळमनुरी ३६७०, औंढा २२७१ अशी तालुकानिहाय दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. यात मुले ९९०९ तर मुली ८८०३ एवढ्या आहेत. त्यामुळे संख्येत कमी झालेल्यांमध्ये मुले २९२, तर मुली ५१५ एवढ्या आहेत.

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी १९५१९

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी १८७१२

आर्थिक अडचण, स्थलांतर मुख्य कारण

मागील वर्षभरात अनेकांना वारंवार रोजगार गमावावा लागला. यंदा ऐन शाळा सुरू होण्याच्या तोंडावर कोरोनाचा कहर कमी झाल्याने कामगार स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पालकांसमवेत मुले गेल्याचा परिणाम झाला असावा. तर आर्थिक अडचणीत काही जणांनी सध्या तरी शाळेला सोडचिठ्ठी दिली. ग्रामीण भागात कमी वयात मुलींचे लग्न लावतात. बालविवाहातूनही काही मुलींची गळती झाल्याची भीती आहे.

इतर कारणांसह पटसंख्येची बोंब

अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे टिकविण्यासाठी मुलांना नाहक प्रवेश दिला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे नाहकचे प्रवेश बंदच दिसत आहेत. शिवाय काही ठिकाणी पटसंख्येचा घोळही असतो. मात्र, दहावीच्या परीक्षा बोर्डाच्या असल्याने तसा घोळ टाळला जायचा. त्यामुळे एरवीही दहावीला विद्यार्थीसंख्या घटते. या कारणांसोबतच दुर्गम भागातील मुलांचे स्थलांतर व इतर कारणेही आहेत. यंदा कोरोनामुळे अनेकांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागत असल्याने पाल्यांसह कामावर गेलेली अनेक कुटुंबे आहेत. ग्रामीण भागात याचा फटकाही काही प्रमाणात दिसतो.

जिल्ह्यात नुकतीच प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. आणखी विद्यार्थी वाढू शकतात. त्यामुळे आताच हे विद्यार्थी गळाले असे म्हणता येणार नाही. प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत ही मुले प्रवाहात येऊ शकतात.

-पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी