शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

२२०० मदतनीसांना मानधन मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:41 IST

जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शासनाकडून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केला जातो. शिवाय तशी तरतूदही आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या महत्त्वपूर्ण योजनेला ग्रहण लागले आहे. कधी तांदूळ वाटपात दिरंगाई तर कधी धान्यादी माल तसेच मदतनिसांचे मानधन रखडते. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून मदतनिसांना १ हजार रूपयांप्रमाणे दिले जाणारे मानधन, इंधन व भाजीपाल्याचा निधी अद्याप संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला नाही. तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया मदतनीस मानधनापासून वंचित आहेत. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही. शासन दरबारी मानधन देण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देत नाहीत. तर संबंधित विभागातील कर्मचारी तर याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे मानधन न मिळण्याचे कारण अद्याप तरी उघडकीस आले नाही. सध्या मदतनिसांचे मानधन बँक खात्यावर जमा करण्यासाठी याद्यांची प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यातील जि. प. च्या १ हजार ३२ शाळांमधून जवळपास १ लाख ६३ हजार, पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु या स्वयंपाकी मदतनिसांना मात्र अद्याप मानधनच न मिळाले नाही. मदतनिसांचे मानधन व इंधन-भाजीपाला यासाठी एकूण २ कोटीं ३२ लाख ८७ हजार ४५३ रूपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. मात्र सदर रक्कम अद्याप बँकेत वर्ग झाली नाही. रक्कम वर्ग न होण्याचे कारण म्हणजे शिक्षण विभागातील शापोआ यंत्रणेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचे स्वयंपाकी, मदतनिसांच्या संघटेनेतर्फे सांगितले जात आहे.या महिन्यांपासून रखडले मानधन४स्वयंपाकी, मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले आहे. यामध्ये हिंगोली व वसमत तालुक्यातील मदतनिसांचे ४ महिन्यांपासून, सेनगाव ५ महिन्यांपासून तर कळमुनरी व औंढा तालुक्यात २ महिन्यांपासून मानधन मिळाले नाही.महाराष्टÑ राज्य शिक्षक संघाने दिले निवेदन४जिल्हा परिषद व खाजगी अनुदानीत शाळेतील शालेय पोषण आहार शिजविणाºया मदतनिसांचे आॅगस्ट -२०१७ पासून मानधन मिळाले नाही. शिवाय मुख्याध्यापकांना संबंधित शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड लिहिण्याकरिता मिळणारे १ हजार रुपये मानधनसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे याची दखल घेत मानधन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्टÑ राज्य शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले. निवेदनावर सुभाष जिरवणकर तसेच शिक्षक संघातील सर्व पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी