शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

२२०० मदतनीसांना मानधन मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:41 IST

जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शासनाकडून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केला जातो. शिवाय तशी तरतूदही आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या महत्त्वपूर्ण योजनेला ग्रहण लागले आहे. कधी तांदूळ वाटपात दिरंगाई तर कधी धान्यादी माल तसेच मदतनिसांचे मानधन रखडते. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून मदतनिसांना १ हजार रूपयांप्रमाणे दिले जाणारे मानधन, इंधन व भाजीपाल्याचा निधी अद्याप संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला नाही. तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया मदतनीस मानधनापासून वंचित आहेत. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही. शासन दरबारी मानधन देण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देत नाहीत. तर संबंधित विभागातील कर्मचारी तर याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे मानधन न मिळण्याचे कारण अद्याप तरी उघडकीस आले नाही. सध्या मदतनिसांचे मानधन बँक खात्यावर जमा करण्यासाठी याद्यांची प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यातील जि. प. च्या १ हजार ३२ शाळांमधून जवळपास १ लाख ६३ हजार, पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. परंतु या स्वयंपाकी मदतनिसांना मात्र अद्याप मानधनच न मिळाले नाही. मदतनिसांचे मानधन व इंधन-भाजीपाला यासाठी एकूण २ कोटीं ३२ लाख ८७ हजार ४५३ रूपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. मात्र सदर रक्कम अद्याप बँकेत वर्ग झाली नाही. रक्कम वर्ग न होण्याचे कारण म्हणजे शिक्षण विभागातील शापोआ यंत्रणेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचे स्वयंपाकी, मदतनिसांच्या संघटेनेतर्फे सांगितले जात आहे.या महिन्यांपासून रखडले मानधन४स्वयंपाकी, मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले आहे. यामध्ये हिंगोली व वसमत तालुक्यातील मदतनिसांचे ४ महिन्यांपासून, सेनगाव ५ महिन्यांपासून तर कळमुनरी व औंढा तालुक्यात २ महिन्यांपासून मानधन मिळाले नाही.महाराष्टÑ राज्य शिक्षक संघाने दिले निवेदन४जिल्हा परिषद व खाजगी अनुदानीत शाळेतील शालेय पोषण आहार शिजविणाºया मदतनिसांचे आॅगस्ट -२०१७ पासून मानधन मिळाले नाही. शिवाय मुख्याध्यापकांना संबंधित शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड लिहिण्याकरिता मिळणारे १ हजार रुपये मानधनसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे याची दखल घेत मानधन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्टÑ राज्य शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले. निवेदनावर सुभाष जिरवणकर तसेच शिक्षक संघातील सर्व पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी